सांगली: भारतात अनेक महापुरूष होऊन गेले. त्यांचे कार्य मोलाचे होते. या महापुरूषांचा शालेय शिक्षणात प्रासंगिक उल्लेख असला तरी त्यांच्या संपूर्ण जीवन, विचार व कार्याची सविस्तर माहिती असलेला संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम गरजेचा आहे. जेणेकरून आधुनिक भारताचा पाया असलेल्या महात्मा ज्योतीराव फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तीनही महापुरुषांच्या कार्याची सविस्तर माहिती नव्या पिढीला होईल. त्यामुळे या तीनही महापुरूषांच्या जीवन, विचार व कार्याची सविस्तर माहिती असलेला अभ्यासक्रम शालेय शिक्षणात समाविष्ठ करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचा मुलगा प्रतिक पाटील यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
हे पण वाचा, कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाला मिळणार गती, जून २०२३ अखेर उस्मानाबाद जिल्ह्याला ७ टी एम सी.पाणी
प्रतिक पाटील म्हणतात, महात्मा ज्योतीराव फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे युगप्रवर्तक कार्याची सर्वांना जाणीव आहेच. या तीनही महापुरूषांच्या विचारांची खऱ्या अर्थाने संपूर्ण आधुनिक भारताची जडणघडण केली आहे. सध्या या तीनही महापुरुषांच्या कार्याचा बालभारतीच्या नवीन पुस्तकांत असलेला उल्लेख काहीसा अपुरा व मोजक्या शब्दांत केला आहे.
हे पण वाचा, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय विनायकराव पाटील यांचा सहकार पॅनलला जाहीर पाठींबा
हे पण वाचा, ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ दौर्याला सुरुवात, जयंत पाटील 18 दिवसात घेणार 82 मतदारसंघांचा आढावा
आधुनिक भारताचा पाया रचणाऱ्या फुले, शाहू, आंबेडकर यांच्या जीवन, विचार व कार्याचा बालभारतीच्या अभ्यासक्रमामध्ये सविस्तर समावेश करावा, अशी मागणी मी आज राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे केली आहे. @VarshaEGaikwad #शाहूमहाराज pic.twitter.com/1kUbNjm39O
— Prateek Patil (@PrateekJPatil) June 26, 2021
सहावी ते दहावीच्या सर्व पुस्तकांचे अवलोकन केले असता वेगवेगळ्या ठिकाणी या महापुरूषांचा प्रासंगिक उल्लेख असला तरी त्यांच्या संपूर्ण जीवन, विचार व कार्याची सविस्तर माहिती असलेला संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम गरजेचा आहे. जेणेकरून आधुनिक भारताचा पाया असलेल्या या तीनही महापुरूषांच्या कार्याची सविस्तर माहिती नव्या पिढीला होईल. आठवी ते दहावी कोणत्याही एका वर्षाचा इतिहासाचा संपूर्ण अभ्यासक्रमात केवळ महात्मा ज्योतीराव फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन, विचार व कार्यावर असायला पाहिजे, अशी मागणी प्रतिक पाटील यांनी केली आहे. दरम्यान, या मागणीवर गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घ्याल, याची अपेक्षा प्रतिक यांनी वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
हे पण वाचा,
- सचिन वाझेनं ईडीला दिलेल्या जबाबात केला, अनिल देशमुखांबाबत मोठा खुलासा
- “प्रताप सरनाईक यांच्याबाबत लवकरच तुम्हाला बातमी मिळेल”- संजय राऊत
- पिंपरीत पंकजा मुंडे, महेश लांडगे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
- “संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचं, हे ज्याला कळतं तोच खरा नेता”- मुख्यमंत्री
- परिस्थिती पाहून स्वबळाचा निर्णय घेऊ, नाना पटोलेंचा यु-टर्न