कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राजकीय ओबीसी आरक्षण, सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर, आज भाजपकडून रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येत आहे. भाजपच्या वतीने आज राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात येत असून, राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणापुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले असून, यामुळे ओबीसींचे मोठे राजकीय नुकसान होणार आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपकडून हे चक्का जाम आंदोलन आज राज्यभरात ठिकठिकाणी करण्यात येत आहे.
परिस्थिती पाहून स्वबळाचा निर्णय घेऊ, नाना पटोलेंचा यु-टर्न
दरम्यान, यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला असून, “संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी साधायाचा, हे ज्याला कळतं तोच खरा नेता असतो. गर्दी करून ताकद दाखवता येते. पण, त्यामुळे महामारीची फैलाव वाढण्याचा धोका आहे,” असे बोल त्यांनी लगावले आहेत. मुख्यमंत्री, आज कोल्हापुरातील सारथी उपकेंद्राच्या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यात बोलत होते.
जो तो आपलं आपलं बघत असतो, ओबीसींचं कोण बघणार? – छगन भूजबळ
यावेळी त्यांनी, “संभाजीराजेंनी संयम ठेऊन, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाचे नेतृत्व केले. समाजाला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरणं हा संघर्षाचा एक भाग आहे. पण, यातला दुसरा भाग म्हणजे, हा संघर्ष कधी करायचा आणि नेमका संवाद कधी करायचा, हे ज्याला कळतं तोच नेता होऊ शकतो. राजे तुम्ही संघर्ष थांबवून सरकारशी संवाद सुरु केलात. मात्र, अनेकजण बाहेर आदळआपट करत आहेत,” असा खोचक टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
खोटा कळवळा आणून राज्यात चक्का जाम आंदोलन करणाऱ्यांनो, “अरे भाई हिप्पोक्रसी की भी सीमा होती है!”
तसेच, “नाती ओढूनताणून पुढे नेता येत नाहीत. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज हवी ती कृती करत शकत होता. अजूनही आपल्याला आरक्षण मिळवण्यासाठी काही कायदेशीर अडथळे पार करायेच आहेत. मात्र कायद्याची लढाई सोडून देऊन उपयोग नाही. आज आपण दाखवलेला समजुतदारपणा उद्याच्या समाजाला दिशा देणारा आहे. या सरकारकडून मराठा समाजासाठी, जे काही करता येईल, ते सगळं केलं जाईल, या लढाईत सरकार कोणत्याहीप्रकारे मागे राहणार नाही, असे वचन मी तुम्हाला देतो,” असे आश्वासन त्यांनी मराठा समाजाला दिले आहे.
Read Also :
- देवेंद्र फडणवीसांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मात्र आंदोलनातला जोर तसूभरही कमी नाही
- यांच्या बायकांनी यांना मारलं, तरी ते मोदीजींनी केलं असं म्हणतील – देवेंद्र फडणवीस
- “खडसे, मुंडे, तावडेंची ‘…याद करो कुर्बानी’, भाजपच्या बॅनरबाजीला काँग्रेसने लावले ‘गालबोट’
- समाजावर अन्याय करताना ठाकरे सरकारला लाज वाटायलां पाहिजे – पंकजा मुंडे
- अवघ्या काही मिनिटातच विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आशिष शेलारांना अटक