मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात सत्तेत येऊन 8 वर्ष पुर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने भाजपकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहेत. तसेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्राच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी सवांद साधला. त्यावेळी त्यांनी काम करण्याची जी संधी मिळाली ही फक्त तुमच्यामुळे, असं म्हणत नरेंद्र मोदींनी यावेळी सवांद साधला.
“दिपाली सय्यद यांच्यावर त्वरीत कारवाई करून त्यांचा पायउतार करावा”; भाजपचं महिला आयोगाला पत्र
मी दिवसरात्र कार्यतत्पर असतो, तेव्हा असं समजू नका की केवळ मीच हे कार्य करतो, 130 कोटींचा जेव्हा हातभार मला लागतो, जेव्हा त्यांचा आशिर्वाद माझ्यापर्यंत पोहोचतो, तेव्हाच मोदी हे कार्य करू शकतो. 130 कोटी देशवासीयांचा सेवक असल्याच्या निमित्ताने हे सेवाकार्य करण्याची जी संधी मला मिळाली, जे सौभाग्य मला मिळालं, मला जो विश्वास मिळाला, तो केवळ भारतीय नागरिकांमुळेच मिळाला आहे, असंही ते म्हणाले.
2014 पूर्वी आपल्या भारताच्या सुरक्षेप्रति फार चिंता व्यक्त केली जात होती. मात्र आता अशा विविध आव्हानांविरुद्ध लढा देण्याचा आत्मविश्वास आपल्याकडे आहे. आम्हाला सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक करणाऱ्या बहादूर जवानांवर खूप गर्व आहे. मोदी सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेमुळे कोट्यवधी नागरिकांना मोफत रेशनची सुविधा उपलब्ध होत आहे. कोरोनासारख्या कठीण काळातही भारतातील ही अन्नसाखळी सुरक्षित ठेवण्याची आणि सुनिश्चित करण्यावर मोदी सरकारने भर दिला आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं आठ वर्षे पूर्ण केली. या निमित्तानं आज मोदीजींनी केंद्राच्या विविध योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधला. देशाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. मुंबईतून कार्यक्रमात सहभागी होत मोदीजींचे प्रेरक विचार ऐकले, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी म्हटले आहे.
पेडणेकरांचा लुडो खेळताना फोटो व्हायरल; निलेश राणे म्हणाले, ”मुंबईकरांनो तुमचे प्रश्न आता..;”
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून देशात मोदी सरकारविरोधात राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसने जोरदार आंदोलने केली आहेत. महागाई तसेच इंधन दरवाढीमुळे सामान्य माणसं त्रस्त झाली आहे. मात्र केंद्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहेत. असा आरोपही विरोधी पक्षांकडून केला जात आहे.
Read also:
- “चौंडी ही पवारांच्या बापाची जहागिरी नाही”; सदाभाऊ खोतांचा शरद पवारांविरोधात एल्गार
- मुंबई वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर; शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांनी वॉर्ड गमवला, भाजपला फायदा
- केंद्राच्या योजनांमध्ये राज्याचा मोठा वाटा; राज्याच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीने योजना सर्वदूर पोहचल्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- “फडणवीससाहेब तुमच्या दोन्ही चेल्याचपाट्याना आवरा; एकाला तुकडा मिळलाय दुसरा वणवण फिरतोय”
- राष्ट्रवादीला सेनेचा मुख्यमंत्री नको की सेनेला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री नको? महाविकासआघाडीत नवी वादाची ठिणगी?