रत्नागिरी : राज्यात सध्या मोठी राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील झाल्याने राजकारणाची खिचडी तयार झाल्याची टिका होत आहे. तर दुसऱ्या बाजूला मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर असून त्यांनी आगामी निवडणुकांबाबत महत्वपुर्ण भाष्य केलं आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या या वक्तव्याची चर्चा सर्वदुर होत आहे.
हेही वाचा…“..त्यामुळे एकनाथ शिंदेंचा सदैव गुलाम म्हणून काम करत राहिन,” शिंदेंचा एक फोन अन् बच्चू कडूंनी निर्णय बदलला
राज ठाकरे चिपळून मध्ये बोलतांना म्हणाले की, राज्यात जो राजकीय व्याभिचार सुरू आहे तो मी करणार नाही. मला तडजोड करावी लागली तर मी घरात बसेन पण तडजोड करणार नाही. असं रत्नागिरीतील महाराष्टर सैनिक मेळाव्यात त्यांनी म्हटलं आहे. तसेच सध्यपरिस्थितीवर मी १५ दिवसात मेळावा घेऊन बोलणार आहे. मेळाव्याच्या माध्यमातून माझ्या मनातील संताप बाहेर काढणार असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“रात्रीचा प्रवास, मुक्काम करा, पण…,” लोकसभेच्या ‘त्या’ १६० भाजपचा मेगा प्लॅन तयार
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, आपण आपला विचार लोकांपर्यंत का पोहचवायचं म्हणत आहोत. पदाधिकाऱ्यांनी एकमेकांशी पदानुसार बोलण्यापेक्षा मनाने एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे. आज चिपळूणमध्ये शाखेचं उद्घाटन झालं. इथे अविनाश जाधव, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई ही सगळी मंडळी येऊन गेली. जोरदार कामाला सुरूवात झाली आहे. असंही राज ठाकरेंनी म्हटलयं.
READ ALSO :
हेही वाचा…“दादांवर बोलणारे प्रसिद्धी पिसाट कालही दरबारी हुजरे होते, अन्..”, मिटकरींची आव्हाडांवर टोलेबाजी
हेही वाचा…“ज्या नेत्यांनी आपलं वयाइतकं राजकारण केलं…,” सुजय विखे पाटलांनी रोहित पवारांवर साधला निशाणा
हेही वाचा…राजकीय गोंधळात शरद पवार आणि ठाकरे गटाला धक्क्यावर धक्का…! पण काॅंग्रेसला मोठा फायदा
हेही वाचा…प्रामाणिक कार्यकर्त्याला अजितदादांकडून बळ, सुदर्शन जगदाळेंची सोशल मिडिया प्रदेशाध्यक्षपदी वर्णी
हेही वाचा…‘त्या’ आमदारांना वळवण्याचा शरद पवार गटाकडून प्रयत्न, थेट फोन करून संपर्क