मुंबई : राज्यातील भाजप महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार मागील काही महिन्यांपासून रखडला आहे. यातच काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यासर्व गोष्टींशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत दाखल झाले. त्यामुळे आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर भाष्य केलं. त्यावर आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…“रात्रीचा प्रवास, मुक्काम करा, पण…,” लोकसभेच्या ‘त्या’ १६० भाजपचा मेगा प्लॅन तयार
छत्रपती शिवाजी महाराज छोट्या साम्राज्याचे राजे होते. दिल्लीत त्यांना ५ हजारांची मनसबदारी दिली. तेव्हा ते ती मनसबदारी लाथाडून महाराष्ट्रात परत निघून आले होते. हा महाराष्ट्राा स्वाभिमान आहे. हीच महाराष्ट्राची भूमिका आहे. एक माणूस जो इथं राजा म्हणून राहत होता, तो दिल्लीला सुभेदार बनायला चालला आहे. मोठ्या राज्यात सुभेदार होण्यापेक्षा, लहान राज्याचा राजा होणं खूप चांगलं आहे. असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवार गटावर प्रतिक्रिया दिली होती.
हेही वाचा…मोठी बातमी…! अजित पवार गटाला अर्थमंत्री अन् मंत्री पद नाही तर ‘या’ कारणामुळे रखडला मंत्रिमंडळाचा विस्तार
दरम्यान, आव्हाडांच्या टिकेनंतर अमोल मिटकरी यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं. दादा कालही राजे होते. आजही राजे आहेत आणि उद्याही राजेच राहणार. दादांवर बोलणारे प्रसिद्धी पिसाट कालही दरबारी हुजरे होते, आजही आहेत, आणि कायमस्वरूपी हुजरेच राहतील. असं म्हणत अंगुरखट्टे है असा हॅशटॅग देखील अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
दादा कालही राजे होते, आजही आहेत आणि उद्याही राजेच राहणार… दादांवर बोलणारे प्रसिद्धी पिसाट कालही दरबारी हुजरे होते,आजही आहेत,आणि पर्मनंट हुजरेच राहतील..#अंगुरखट्टेहै 😄
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 12, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“ज्या नेत्यांनी आपलं वयाइतकं राजकारण केलं…,” सुजय विखे पाटलांनी रोहित पवारांवर साधला निशाणा
हेही वाचा…राजकीय गोंधळात शरद पवार आणि ठाकरे गटाला धक्क्यावर धक्का…! पण काॅंग्रेसला मोठा फायदा
हेही वाचा…प्रामाणिक कार्यकर्त्याला अजितदादांकडून बळ, सुदर्शन जगदाळेंची सोशल मिडिया प्रदेशाध्यक्षपदी वर्णी
हेही वाचा…‘त्या’ आमदारांना वळवण्याचा शरद पवार गटाकडून प्रयत्न, थेट फोन करून संपर्क
हेही वाचा…“..त्यामुळे एकनाथ शिंदेंचा सदैव गुलाम म्हणून काम करत राहिन,” शिंदेंचा एक फोन अन् बच्चू कडूंनी निर्णय बदलला