सांगली: ड्रोनद्वारे शेतात खते आणि औषधे फवारणी करणारा राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना हा राज्यातील पहिला साखर कारखाना ठरला असल्याचे प्रतिपादन व्हीएसआय या साखर उद्योगातील शिखर संस्थेचे संचालक विकास देशमुख यांनी काढले आहे. विकास देशमुख यांनी राजारामबापू कारखान्याच्या माध्यमातून आष्टा व कारंदवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील ड्रोनद्वारे औषध फवारणी प्रात्यक्षिकांची पाहणी करून कारखाना कार्यस्थळास भेट दिली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी श्रेणिक कबाडे, विराज शिंदे, वैज्ञानिक एस. एस. दळवी आदी उपस्थित होते.
हे पण वाचा, ‘‘नितीन गडकरींचे कारखाने योग्य पद्धतीने चालू आहेत’’; चंद्रकांत पाटलांचे घुमजाव
विलास देशमुख म्हणाले , जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखान्याने सातत्याने अद्यावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांना नवनवीन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसून येत आहे. ड्रोनसाठी डीजीसीची परवानगी घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि लवकरच परवानगी मिळेल देखील. त्यामुळे ड्रोन वापरण्यास कोणतीही अडचण ठरणार नाही. कारखान्याने राबविलेल्या लक्ष्य एकरी १०० टनाचे या उपक्रमामुळे साडेतीन हजार शेतकरी शंभर टनाच्या वरती एकरी उत्पादन घेत आहेत आणि हा आदर्श आता राज्यातील इतर कारखान्यांनी देखील घ्यायला हवा.
हे पण वाचा, पारनेर कारखाना पुन्हा सहकारात रुजू करण्यासाठी आमदार निलेश लंकेचे एक पाऊल पुढे
हे पण वाचा, अहमदनगर जिल्ह्यातील ‘पारनेर साखर कारखाना’ चौकशीच्या भोवऱ्यात
कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील म्हणाले आम्ही नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहोत. कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेणे, हा आमचा कायमच प्रयत्न राहणार आहे. वाळवा तालुक्यात पंजाब, हरियाणाच्या तुलनेत ९३ टक्के क्षेत्र सिंचनाखाली येते मात्र केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेती आणि सहकार अडचणीत आलेला आहे. साखरेला किती दर मिळतो आणि उत्पादन खर्च किती येतो याचा ताळमेळ आता घालायला हवा असे प्रतिपादन देखील त्यांनी केले आहे.
हे पण वाचा,
- ED च्या कचाट्यात सापडलो म्हणून पळून जाणार नाही; प्रताप सरनाईक पहिल्यांदाच आले समोर
- ठाकरे सरकारकडून लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम, देवेंद्र फडणवीस आक्रमक
- नितीन गडकरींच्याही कारखान्यांची ईडी चौकशी होणार? केंद्रीय गृहमंत्र्यांना दिलेल्या पत्रात चंद्रकांत पाटलांनी केली आहे मागणी
- सरकारने लोकशाहीला कुलूप लावलं; MPSC वाल्या विद्यार्थ्यांचे तीन तेरा वाजले – फडणवीस आक्रमक
- सरकारची पाठराखण करण्यासाठी चमचेगिरी करू नका; सुधीर मुनगंटीवार सत्ताधाऱ्यांवर भडकले