पुणे : गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील नामदेव जाधव यांनी आपल्या 2 एकरामधील उसाला आग लावून त्यानंतर झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यामुळे राज्य सरकारवर सध्या सगळ्या स्तरातून टिका होत आहे. उसाचा कालावधी संपूनही तोड होत नव्हती. यासाठी जाधव यांनी साखर कारखाना, मुकादम, उसतोड कामगार यांचे पाय धरले होते. पंरतु कारखाना प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ते हताश झाल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर येत आहे.
तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात संभाजी राजेंना प्रवेश नाकारला, अन्..;
मराठवाड्यात वाढलेले क्षेत्र आणि साखर कारखाना यंत्रणाही माहिती असुनही अतिरिक्त उस प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यानेच बीडच्या 32 वर्षीय शेतकऱ्याने उसाच्या फडाला लागूनच असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. राज्यकर्त्यांनो अजून किती मुडदे पाडणार आहोत आणि किती मुडद्यांवर तुम्ही राज्य करणार आहात अशा शब्दात राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
भाजप नेते गणेश नाईक म्हणाले, हे प्रकरण संपल्यानंतर मी..; बलात्कार प्रकरण त्यांना भोवलं
अतिरिक्त उसाबाबत शासन हे गाफिल राहिलेले आहे हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. लागवड क्षेत्र, अंदाजित उत्पादन आणि साखर कारखान्यांची संख्या असे सर्वकाही असतानाही केवळ नियोजन झाले नाही. ज्याप्रमाणे पाणी टंचाई लक्षात घेताच विहिरींचे अधिगृहन करून भविष्यातील काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे बंद पडलेले साखर कारखाने हे शासन स्तरावर सुरू करणे गरजेचे होते. पण तसे काही न झाल्यामुळे हा यंत्रणेचा बळी ठरला आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले.
” केंद्र सरकारने वेळीच धडा घेतला नाही तर महागाईचा भस्मासूर उग्र रूप धारण करेल”
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात विशेषत मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला. यासंबंधीची सर्व माहिती प्रशासनाला होती. शिवाय मराठवाड्यात वाढलेले क्षेत्र आणि साखर कारखाना यंत्रणाही माहिती असूनही या अतिरिक्त उस प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यानेच बीडच्या 32 वर्षीय शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचललं आहे.
Read also:
- “हेडलाईन मिळवण्यासाठी नाना पटोलेंचं वक्तव्य”; नाना पटोलेंच्या वक्तव्याला अजित पवारांचं प्रत्युत्तर
- शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन; दुबईवरून पार्थिव आणण्याचे प्रयत्न सुरू
- राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील वाद दिल्लीत जाणार! राष्ट्रवादी-भाजप संबंध उघडे पाडण्याचा पटोलेंचा इशारा
- ‘राष्ट्रवादीने सुरा खुपसला’ हा नाना पटोलेंचा आरोप चुकीचा – जयंत पाटील
- जे कुटुंब प्रेमळ तिथं भांड्याला भांड लागतंच; नाना पाटोलेंच्या आरोपावर सुप्रिया सुळेंची सारवासारव