रत्नागिरी : शिवसेनेचे नेते फक्त खोके..खोके बोलत आहेत. हे त्यांनी बोलावं यासारखे दुसरं आश्चर्य नाही. मातोश्रीला खोके नवीन नाहीत. आतापर्यंत मातोश्रीला किती मिठाईचे खोके गेले, हे आम्हाला माहिती आहे. याबद्दल आता आम्हाला तोंड उघडायला लावू नका, असा इशारा शिंदे गटातील आमदार रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
“तुमच्या सिंहासनाला कधी सुरूंग लागेल, हे कळणार देखील नाही”; अमोल मिटकरी
तसेच दसरा मेळाव्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ मी बोलणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा शिवतीर्थावरच घ्यावा, असं आमचं मत आहे. बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. उद्धवजींकडे शरद पवार यांचे विचार आहेत. त्यामुळे शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे, असा टोला रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लगावाला आहे.
“राज ठाकरे हे प्रकरण शंभर टक्के गांभीर्याने घेतील”; किशोरी पेडणेकर
बाळासाहेबांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली. त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आहे. त्यांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा तरी अधिकार आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. बाळासाहेबांचे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत, असं रामदास कदम म्हणाले आहेत.
“शिक्षक, पदवीधर मतदारसंघ रद्द करा”; प्रशांत बंब यांची मागणी
उद्दव ठाकरे यांच्याकडे शरद पवारांचे विचार आहेत. त्यामुळे शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे. सुरूवातीला त्यांनी आमदारांना आव्हाने दिली. गुहावाटीला गेलेत त्यांनी मतदारसंघात पाय ठेऊन दाकवा. नंतर म्हणाले वरळीतून जाऊन दाकवा. मग म्हणतात विधानभवनात पाऊल ठेऊन दाखवा. आता त्यांच्या नाकावर टिच्चून आमदार महाराष्ट्रभर फिरत आहेत. तुमचं काय योगदान, ते फक्त आता बोलण्यापुरते आहे, असा टोला रामदास कदम यांनी लगावला आहे.
Read also
- “‘कार्यक्रम काॅंग्रेसचा, मात्र भाजपचेच नेते कार्यक्रमात असणार”? पुणे फेस्टिव्हलच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडणार
- ”भाजप करणार मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ”; अमित शहा 5 सप्टेंबर रोजी मुंबईत
- “मिटकरींच्या विरोधातील सर्व पुरावे उघड करणार”; राष्ट्रवादीच्याच जिल्हाध्यक्षाचा मिटकरींना इशारा
- “शिंदे- फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट अन् इडीचं सरकार”; सुप्रिया सुळेंची टिका
- “मोदी सरकार हे भांडवलदारांचे, हे आता स्पष्टचं झालंय”; राष्ट्रवादीचा भाजपला खोचक टोला