मुंबई : अधिकाऱ्यांनो आणि कर्मचाऱ्यांनो कुणाच्याही दबावाला बळी न पडता, कोणतंही चुकीचे काम करू नका, सत्ता येत असते. दिवस बदलतात. कधी आम्ही सत्तेवर येऊ काही सांगता येत नाही. असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्यावर खोचक टोला हाणला आहे.
“मुख्यमंत्र्यांना धमकीचे फोन म्हणजे सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न”
अजित पवार यांना पहाटे शपथ घेण्याची सवय झाली आहे. त्यांनी सरकार स्थापन केलं होतं. पण त्यांना ते जमलं नाही. त्यामुळे अजित पवार यांना जे जमलं नाही ते एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलं. त्यामुळे अजित पवार इकडे येत असतील तर त्यांचं स्वागतच आम्ही करू. अशी मिश्किल टिप्पणी देखील रामदास आठवले यांनी अजित पवार यांच्यावर दिली आहे.
अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीसाठी सेना-भाजपमध्ये रंगत.! शिंदे गटाची माघारी
एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, एक गोष्ट लक्षात घ्या. आम्ही पण सरकारमध्ये अनेक वर्ष होतो. आमच्यातर्फे पवार साहेब केंद्रामध्ये कृषीमंत्री असताना आमच्याकडे केंद्रातील सत्ता होती. राज्यातील सत्ता होती. जिल्हा परिषद, तसेच एखाद दुसरी सोडली तर जवळपास सर्व पंचायत समित्या राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. इतर संस्थाही ताब्यात होत्या.
“…तर कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही”; सेनेचा दुसरा टीझर व्हायरल
मात्र आम्ही कधी सत्तेचा माज येऊ दिला नाही. सत्तेपायी आम्ही कधी आमच्या विरोधकांनाही त्रास दिला नाही. मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सांगायचं आहे की, अधिकाऱ्यांनो आणि कर्मचाऱ्यांनो कुणाच्या दबावाला बळी पडून कारण नसताना चुकीचं काम करू नका, दिवस बदलत असतात. कधी आम्ही सत्तेत येऊन बसू कळणारही नाही. असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.
Read also
- “अंधेरी पुर्व पोटनिवडणुक..! उद्धव ठाकरे कोणत्या निवडणुक चिन्हांवर लढणार”; ? निर्णय अजून
- “पडळकर तुम्ही ताटात जेवता की गोठ्यात? अन्न खाता की शेण?” राष्ट्रवादीचा पलटवार
- “बारामतीचा शरदचंद्र पवार नावाचा माणूस हा बहुजनांचा कर्दनकाळ”; गोपीचंद पडळकर
- “लक्षात ठेवा…! आम्ही बारीक लक्ष ठेऊन आहोत”; फडणवीसांचा इशारा
- भाजप-सेनेच्या लढाईत, राष्ट्रवादीचा सेनेला पाठिंबा..! अंधरी पुर्व पोटनिवडणुकीत रंगत येणार