अमरावती : काहीही करून अफवा फसरावयाच्या आणि सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वळवायचं आणि सहानुभूती मिळवायची. अशी प्रतिक्रिया काॅंग्रेस आमदार यशोमती ठाकुर यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अलिकडेच जीवे ठार मारण्याची धमकीचा फोन आला. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यावर बोलताना यशोमती ठाकुर यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
“मला कोणीही रोखू शकत नाही”; धमकीच्या फोननंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
जर मुख्यमंत्र्यांनाच धमकीचे फोन यायला लागले आहेत. तर यावरून महाराष्ट्राची परिस्थिती कशी असणार असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. तसेच महाराष्ट्राने आतापर्यंत दर्जेदार राजकारण केलं आहे. ते दर्जेदार राजकारण यापासून देखील पुढे होणार आहे. असं देखील यशोमती ठाकुर यांनी म्हटलं आहे.
“नवाब मलिकांनी संजय राऊतांना तुरूंगात काय सांगितलं असेल..;” शिंदे गटाचा खोचक टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकीची दखल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेसह इतर बाबींवर गृहविगाची नजर असल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे. मात्र शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची माहिती खोटी दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरूणाला अटक केली होती. त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली आहे.
“छाताडावर भगवा झेंडा घेऊन बाहेर निघालोय, ऐऱ्यागैऱ्याची औलाद नाहीय”
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला धमक्यांचे अनेकदा फोन आलेले आहेत. या धमक्यांंचा माझ्यावर परिणाम होत नाही. मी जनतेतला माणुस आहे. मला जनतेमध्ये जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांना त्यांच्या कार्यालयात महिनाअगोदर धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर धमकीचा फोन देखील आला होता.
Read also
- “…तर कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही”; सेनेचा दुसरा टीझर व्हायरल
- अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीसाठी सेना-भाजपमध्ये रंगत.! शिंदे गटाची माघारी
- “माझ्या आयुष्यातील पहिलाच प्रसंग, जिथं लोक माझ्यावर बोलतात अन् मला ऐकावे लागते”; शरद पवार
- मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन…! फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….;
- मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंसोबतच..; शिंदे गटात जाण्याच्या चर्चेंना दिला फाटा