पुणे : माझ्या आयुष्यातील पहिलाच प्रसंग असेल की, जिथे लोक माझ्यावर बोलतात आणि ते मला ऐकावे लागते आहे. सहसा ती वेळ येऊ नये याची मी काळजी घेत असतो. असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. पुणे येथील वानवडीमधील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे रयत शिक्षण संस्था, पश्चिम विभाग आयोजित ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक व शरद रयत चषक वितरण समारंभास उपस्थित ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
“एक तरफ दसरा, एक तरफ कचरा”; अरविंद सावंतांचा शिंदे गटावर हल्लाबोल
एखादा विषय दिल्यानंतर त्या विषयावर आपण विचार करावा, काही बोलावे, लिहावे ही भावना या विद्यार्थ्यांमध्ये या वयात निर्माण होते. अत्यंत जमेची बाब आहे. विषय दुसरा घेतला असता तर ही स्पर्धा अधिक उपयुक्त झाली असती. मला स्वतःला असे वाटते, संस्थेच्या वतीने असे उपक्रम हातामध्ये घेत असताना या संस्थेमध्ये सध्या असलेल्या प्रमुख व्यक्तींना पुढे घेण्याची भूमिका शक्यता टाळावी. स्पर्धा झाल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. उत्तम लिखाण तसेच उत्तम कल्पना विस्तार झालेला असेल त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम झाले पाहिजे. लहान वयातच व्यक्तिमत्त्व घडवण्याची प्रक्रिया सुरू होते. ती त्या व्यक्तीच्या व कुतूहलाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त आहे. विषयाची निवड करताना साधरणतः उदाहरणार्थ जगामध्ये परिवर्तन होत आहेत त्याच्यामध्ये विज्ञानाचे योगदान, देशामध्ये ५ जी तंत्रज्ञान सुरू होत आहे. हे तंत्र माणसामाणसांमध्ये जवळीक वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पण त्याची माहिती किती लोकांना असते. ती माहिती नसली तर जी विज्ञानामध्ये परिवर्तन होतात, इनोव्हेशन होतात, त्या सगळ्यांची आस्था विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हायची असेल तर त्यांना पोषक असा विषय स्पर्धेसाठी निवडला तर त्याची उपयुक्तता अधिक आहे.
“अन्यथा सांगोल्याची जनता तुम्हाला मराठी बिग बॉस किंवा हास्यजत्रेत पाठवेल”
कर्मवीरांनी ही संस्था स्थापन केली. अण्णांनी या संस्थेच्या माध्यमातून समतेचा व परिवर्तनाचा संदेश दिला. सामान्य कुटुंबांतील मुला-मुलींना त्यांच्यातील स्वत्व जागृत करण्याची भूमिका कर्मवीरांनी सांगितली. परिवर्तनाच्या चळवळीमध्ये कर्मवीरांचे योगदान असा विषय घेतला तर माझी खात्री आहे की मुलामुलींना कर्मवीरांनी परिवर्तनाच्या माध्यमातून जी भूमिका समाजात रुजवण्याची खबरदारी घेतली, त्या संबंधीचे आकर्षण व आस्था नव्या पिढीला जाणवल्याशिवाय राहणार नाही. आज समाजात ५० टक्के भगिनी कर्तृत्वाच्या बाबतीत कुठे कमी नाहीत. पण त्या कर्तृत्वाची जाण आपण ठेवतो का? त्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देतो का? मी कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकते, हा आत्मविश्वास त्या मुलीच्या मनात तयार होतो का? जर होत नसेल तर त्याला पोषक अशा प्रकारचा विषय आपण घेतला. जसे की सार्वजनिक तसेच व्यक्तिगत जीवनात कर्तृत्वाने यशस्वी झालेल्या भगिनी व त्याची मीमांसा जर असा विषय घेतला तर माझी खात्री आहे की, मुलींना त्याचा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही. संस्थेच्या उभारणीत कर्मवीरांनी छोटी मोठी गावागावातील माणसं घेतली. संस्थेला देणगी म्हणून रक्कम देणाऱ्यांपेक्षा त्यांच्यासोबत उभारणीच्या कामात पूर्ण ताकदीने कर्मवीरांसोबत उभे राहिलेल्या, घाम गाळलेल्या प्रकारच्या लोकांची मालिका अण्णांनी संस्थेच्या माध्यमातून सुरू केली. अशा व्यक्ती अण्णांचे मोठे धन होते. म्हणून संस्थेच्या उभारणीमध्ये लहान-मोठ्या लोकांनी योगदान दिले. अशा लोकांच्या संबंधीचे परीक्षण करणारे लिखाण विद्यार्थ्यांकडून आले तर त्याचा उपयोग त्या व्यक्तीच्या जडणघडणीसाठी उपयुक्त ठरल्याशिवाय राहणार नाही, असा माझा विश्वास आहे. असंही ते म्हणाले.
“अजित दादांना काहीच काम राहिलं नाही, त्यांनी शिंदे, ठाकरे, इंदोरीकरांचं भाषणं ऐकावीत”
दरम्यान, ही स्पर्धा सुरू राहिली पाहिजे. परंतु विषय असे निवडले पाहिजे की त्यामधून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी उपयुक्त असेल आणि समाजाला दिशा देण्यासाठी फायदेशीर ठरेल. याची काळजी आपण घेतली पाहिजे. व्यक्तिमत्व घडवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. पण आपण त्याच्याकडे किती लक्ष देतो? त्याच्याबद्दल विचार करायची वेळ आज आलेली आहे. एका गोष्टीबाबत मला नेहमी अस्वस्थता वाटते. समाजातील काही घटक अजूनही मजबूतीने उभे करण्यासाठी जे योगदान दिले पाहिजे त्यात कमी पडतो. तो घटक म्हणजे समाजातील ५० टक्के स्त्रीवर्ग. स्त्रियांमध्ये कर्तृत्वाच्या बाबतीत कमतरता नाही. कर्तृत्वाचा कित्ता फक्त पुरुषाकडे नाही. आज कितीतरी स्त्रिया कष्टाने कर्तृत्वाने मोठ्या झाल्या आहेत. संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांना प्रोत्साहित करणारे कार्यक्रम हाती घ्यावे. त्यामुळे समाजाच्या उभारणीत त्यांचे योगदान लाभेल. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी स्त्रियांना आपण दिली पाहिजे. हे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून घडले तर ते सामान्य कुटुंबापर्यंत जाईल. ही जबाबदारी तुमची माझी सर्वांची आहे. समाजातील ५० टक्के लोकसंख्या असणाऱ्या स्त्रियांच्या माध्यमातून सुद्धा या समाजाची आणि देशाची उभारणी होऊ शकते. त्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पायाभरणी केली जाते. याचे समाधान असल्याचंही ते म्हणाले.
Read also
- मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन…! फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….;
- मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंसोबतच..; शिंदे गटात जाण्याच्या चर्चेंना दिला फाटा
- “मला कोणीही रोखू शकत नाही”; धमकीच्या फोननंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
- “नवाब मलिकांनी संजय राऊतांना तुरूंगात काय सांगितलं असेल..;” शिंदे गटाचा खोचक टोला
- “छाताडावर भगवा झेंडा घेऊन बाहेर निघालोय, ऐऱ्यागैऱ्याची औलाद नाहीय”