मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणावरून जोरदार राजकारण सुरू आहे. अशातच आता या प्रकरणात तत्कालीन पोलीस उपायुक्त पंकड डहाणे यांची आज कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीनंतर पोलिसांकडून जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणत्या गोष्टींचा उलगडा होईल त्याकडे लक्ष लागून आहे.
अध्यक्षपद निवडणुकीचा प्रस्ताव राज्यपालांनी फेटाळला; सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष पेटणार
राजकीय नेत्यांचे फोन टॅपींग केल्याप्रकरणी माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस अधिकाऱ्यांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांचाही जबाब घेतला जाण्याची शक्यता आहे.
RSS च्या मुस्लिम शाखा उघडणाऱ्या सरसंघचालकांना फडणवीस ‘जनाब’ म्हणणार का?
फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांची चौकशी सध्या कुलाबा पोलीस ठाण्यात सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रश्मी शुक्ला या चौकशीला हजर झाल्या. त्यांच्यावर राज्य गुप्तवार्ता विभागामध्ये असताना फोन टॅपिंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोन टॅपिंग केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारमधील काही नेते आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.
याप्रकरणी नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर 500 कोटींचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, मी स्वत: सोमवारी 500 कोटीचा दावा रश्मी शुक्ला, डीजी, नागपुर सीपी यांच्यावर ठोकणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येता कामा नये. तसेच सुत्रधारांचा पर्दाफाश महाविकास आघाडी सरकार केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
Read also:
- “आगे आगे देखो होता है क्या”; ईडीच्या कारवाईनंतर राणेंचा शिवसेनेला सूचक इशारा
- “आता ही ईडी गावागावात गेलीय “; मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकावर झालेल्या कारवाईनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
- उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई; 6 कोटीपेक्षा अधिक संपत्ती जप्त
- तुम्ही सगळे श्रेय घ्या, पण एसटीचा संप मिटवा; चंद्रकांत पाटलांचं राज्य सरकारला आवाहन
- उच्च न्यायालयाकडून नारायण राणेंना अधिश बंगल्याप्रकरणी दिलासा ; नितेश राणेंचा सेनेला ‘हा’ गंभीर इशारा