मुंबई : शिवसेना पक्ष फुटीनंतर खासदार संजय राऊत सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन शिंदे गटावर निशाणा साधत आहेत. तर संजय राऊतांना देखील शिंदे गटातील नेत्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. यातच संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. परंतु एकनाथ शिंदे यांनी तो डाव उधळून लावला असल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटातील प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यामुळे याची राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…“आमदार अपात्रतेप्रकरणी आता अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाकडून शेवटची संधी”, वाचा संपूर्ण युक्तवाद
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात भांडणं लावायची अन् आपण मुख्यमंत्री बनायचं असा संजय राऊतांचा डाव होता. परंतु हा डाव एकनाथ शिंदेंच्या कृतीमुळे उधळला आहे, त्यामुळे संजय राऊत भ्रमिष्ट झाले आहेत. अशी टिका नरेश म्हस्के यांनी केली आहे. तसेच संजय राऊत हे जल्लाद आहेत. असा घणाघात देखील त्यांनी केलाय.
हेही वाचा…“नाही तर वेळापत्रक काढण्याचा आम्ही आदेश देऊ शकतो”, कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना जोरदार फटकारत दिला इशारा
दरम्यान, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांपासून उद्धव ठाकरे यांना बाजूला करण्याचं काम जल्लाद म्हणून संजय राऊतांनी केलं आहे. अशी टिका देखील नरेश म्हस्के यांनी केलीय. त्यामुळे यावर आता ठाकरे गटाकडून विशेष करून संजय राऊतांकडून काय प्रत्युत्तर देण्यात येईल. ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभेसाठी अजितदादांसाठी रणनिती ठरली..! ‘या’ पाच नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार
हेही वाचा…जरागेंच्या अल्टिमेटला फक्त सात दिवस बाकी, मंत्रालयात मंत्र्यांची मोठी धावपळ
हेही वाचा…“दादांनी मुख्यमंत्री पदाचा कोट शिवायला टाकला की काहींना काही विघ्न येतातच”,आधी धरण अन् आता जमीन पाठ सोडेना
हेही वाचा…“चौकशी करा किंवा अन्य काही करा,फरक पडत नाही”, बोरवणकरांनी केलेले आरोप अजित पवारांनी फेटाळले
हेही वाचा…“ड्र्ग्जप्रकरणाबाबत नाशकात महत्वाची बैठक,” दादा भूसेंनी दिले कठोर कारवाई करण्याचे आदेश