नाशिक : नाशिक शहरात ‘अमली पदार्थ विरोधी जनजागरण चळवळ’ बाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शहरातील अवैध धंदे चालकांवर कठोर कारवाईचे निर्देश पालकमंत्री आणि मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. तरुणाईमध्ये ड्रग्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून तरुणाई आहारी गेल्याचे चर्चेतून निदर्शनास आले. यामुळे फक्त कारवाईवर न थांबता जनजागृती करणे देखील महत्वाचे असल्याने आज “अमली पदार्थ विरोधी जनजागरण चळवळ” संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. येणाऱ्या आठ दिवसाच्या आठ रस्त्यावर उतरून कारवाईच्या माध्यमातून काम दिसले पाहिजे अशा सूचना यावेळी यंत्रणेला सूचना देखील दादा भूसे यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा…“पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळे जागतिक सागरी क्षेत्रात भारताचे स्थान उंचावले”, एकनाथ शिंदे
एका बाजूला पोलिस प्रशासन कारवाई करेलच मात्र त्याचवेळी समाजात विघातक परिणामांची जनजागृती होणे गरजेचे आहे. जी तरुणाई व्यसनाच्या आहारी गेली आहे त्यांचे समाज परीवर्तन होणे गरजेचे आहे. याला अनुसरून काय उपाययोजना आखणे गरजेचे आहे याचा उहापोह या बैठकीत झाला. यावेळी नागरिकांनी देखील आपल्या काही सूचना असल्यास लेखी स्वरूपात पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयात कळविण्याचे आवाहनही दादा भूसे यांनी केले आहे.
बेकायदेशीर जे असेल त्याच्यावर हातोडा चालविण्याच्या देखील सूचना यावेळी दिल्यात. मी या आधीच अवैध धंदे चालकांची गय करू नका अशी भूमिका घेतली आहे. ड्रग्स बाबत काही दिवसापूर्वी माहिती मागवली होती त्यानुसार शहरात पोलिस कारवाई करण्यात आली. येणाऱ्या काळात अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून समूळ उच्चाटन केले जाईल. अवैध धंदा चालकांना कुठल्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही. येत्या काही दिवसात विशेष पथकांच्या माध्यमातून देखील इतर अवैध धंद्यांवर देखील टाच आणली जाईल एका बाजूला पोलिस प्रशासन कारवाई करेलच मात्र त्याचवेळी समाजात विघातक परिणामांची जनजागृती होणे गरजेचे आहे. जी तरुणाई व्यसनाच्या आहारी गेली आहे त्यांचे समाज परीवर्तन होणे गरजेचे आहे. याला अनुसरून काय उपाययोजना आखणे गरजेचे आहे याचा उहापोह या बैठकीत झाला.
हेही वाचा…शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणासंदर्भातील सुनावणी पुन्हा लांबणीवर, दिवाळीनंतर निकाल लागणार ?
या बैठकीत आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. सरोज अहिरे, आ. राहुल आहेर, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त , नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक, आरोग्य विभाग अधिकारी, अन्न व प्रशासन विभाग अधिकारी, प्रमुख शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, प्रमुख महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच अन्य अधिकारी .
या बैठकीला उपस्थित होते. टास्क फोर्स निर्माण करून कारवाई करावी, तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सक्रिय व्हावे, मी स्वतः जरी कुणाला वाचविण्यासाठी कॉल केला असेल तर माझी देखील चौकशी करा, ज्या लोकप्रतनिधींचे कॉल कुणाला वाचवायला जात असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई करा.
READ ALSO :
हेही वाचा…“आमदार अपात्रतेप्रकरणी आता अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाकडून शेवटची संधी”, वाचा संपूर्ण युक्तवाद
हेही वाचा…“नाही तर वेळापत्रक काढण्याचा आम्ही आदेश देऊ शकतो”, कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना जोरदार फटकारत दिला इशारा
हेही वाचा…“समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय”, वाचा सविस्तर
हेही वाचा…मराठा आरक्षणावर विखे पाटलांचा तिखट वार, जरांगे पाटलांच्या ‘त्या’ भूमिकेवर घेतला आक्षेप
हेही वाचा…“ठाणे कुणाचा गड? निवडणुका लागल्यानंतर कळेल,” राजन विचारेंनी शिंदेंना दिले आवाहन