मुंबई : शिवसेना खासदार आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे-शिवसेना वादाच्या आणि भाजप नेते नितेश राणे यांनी दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे, सध्या त्यांच्या घराला आणि ‘सामना’च्या कार्यालयाला छावणी सारखं स्वरूप आलं आहे.
“…तर ५ सप्टेंबरला जलसमाधी घेऊ,” राजू शेट्टींचा ठाकरे सरकारला इशारा; पंचगंगा परिक्रमा सुरू
नारायण राणेंनी काही दिवसांपूर्वी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान सातत्याने शिवसेनेवर शाब्दिक हल्ला चढवला होता. मात्र, महाड मध्ये असताना त्यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या खळबळजनक वक्तव्यानंतर राज्यात शिवसेना-भाजपच्या संघर्षाने टोकाचे रूप घेतले. त्याचे पडसाद राज्यभर उमटले. यावरून दोन्ही पक्षाच्या नेत्यांत देखील मोठ्या शाब्दिक चकमकी झडल्या. ‘सामना’मधून राणेंवर घणाघाती टीका झाली. त्यामुळे पुन्हा संजय राऊत आणि राणे वाद पेटला.
मनसे अध्यक्षांनी घेतली सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळेंची भेट, दिली पहिली प्रतिक्रिया
सध्या, राऊत यांना ‘Y’ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली असून, त्यांच्या ताफ्यात या घडीला ६ शस्त्रधारी SPU जवानांचा ताफा आहे. मात्र, नवीन सुरक्षेनुसार त्यांच्या ताफ्यात अतिरिक्त २ SPU चे जवान समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच, अतिरिक्त १२ पोलीस जवानांबरोबर साध्या वर्दीतील पोलिसांचा समावेशही त्यात करण्यात आला आहे. दुसरीकडे, डीसीपी प्रशांत कदम संजय राऊत यांच्या भेटीला गेल्याची देखील माहिती समोर येत आहे.
Read Also :
- मविआ नेते राज्यपालांना भेटणार? १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न सुटण्याची शक्यता!
- “थांबा, दिवाळीनंतर आमचेच सरकार राज्यात येईल” रोहित पवारांच्या मतदारसंघात सुजय विखेंना गुदगुल्या
- अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक, बंगल्याचं मोठं नुकसान, काय घडलं?…
- पीएमआरडीएच्या आराखड्याविरोधात माजी राज्यमंत्री संजय भेगडे मैदानात
- यात्रा आणि आंदोलन करणाऱ्या भाजप-मनसेला मुख्यमंत्र्यांनी फटकारले, म्हणाले…