कोल्हापूर : जून-जुलै महिन्यात राज्यात अतिवृष्टीने थैमान घातले. यात सर्वात जास्त नुकसान झाले ते कोल्हापूर, रायगड, सांगली या पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांचे; परंतु या भागातील पूरग्रस्तांना सरकारकडून अजूनही मदत मिळाली नसून, ती तातडीने मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी (१ सप्टेंबर) आज ‘पंचगंगा परिक्रमा’ सुरू केली आहे. ही परिक्रमा कोल्हापूरच्या प्रयाग चिखली पासून नरसिंह वाडीपर्यंत निघणार आहे.
मनसे अध्यक्षांनी घेतली सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळेंची भेट, दिली पहिली प्रतिक्रिया
याबाबत बोलताना त्यांनी सांगितले, “राज्यातील अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने सांगली आणि कोल्हापुराचं अतोनात नुकसान झालं. शेतकऱ्यांची शेतीच्या शेती वाहून गेली. लोकांची घरं पाण्याखाली बुडाली, कित्येकांचे संसार मातीमोल झाले. मात्र, या राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना अजूनही कोणतीही मदत दिली गेली नाहीये. त्यामुळे, त्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी,” तसेच, “२०१९ च्या जीआरनुसार पूरग्रस्तांना मदत देण्यात यावी. यासाठी कुणालाही वेठीस धरायचा आमचा हेतू नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
श्री. क्षेत्र प्रयाग चिखली दक्षिण काशी येथे श्री गुरूदेव दत्तांना अभिषेक घालून प्रयाग चिखली ते नृसींहवाडी पुरग्रस्त शेतकर्यांच्या आक्रोश मोर्चेच्या पदयात्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेटटी यांनी सुरवात केली. pic.twitter.com/jnv22BChN3
— Raju Shetti (@rajushetti) September 1, 2021
मविआ नेते राज्यपालांना भेटणार? १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न सुटण्याची शक्यता!
दरम्यान, राजू शेट्टी यांनी पूरग्रस्तांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी २३ ऑगस्टला मोर्चा काढला होता. यात त्यांनी पंचगंगा परिक्रमेचा इशारा दिला होता. पण याची ठाकरे सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे, आज पंचगंगा परिक्रमेची घोषणा करत त्यांनी ती सुरू केली. त्याआधी त्यांनी प्रयाग संगमावरील दत्त मंदिरात अभिषेक केला आणि नंतर यात्रेला सुरुवात झाली. आता ही यात्रा ५ दिवस चालणार असून, सरकारने मागण्या न केल्यास, ५ सप्टेंबरला शेट्टी पूरग्रस्तांसह जलसमाधी घेणार आहेत.
अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक, बंगल्याचं मोठं नुकसान, काय घडलं?…
दुसरीकडे, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे. “कृष्णा, पंचगंगा नदीतील महापुराचं पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्याच्या घोषणा या निव्वळ धूळफेक करणाऱ्या असून, या योजना पैसे खाण्याचा उद्योग आहेत,” असं म्हणत, “मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांसाठी पॅकेजची घोषणा केली, पण ती त्यांना अजूनही मिळावी नाही. उपमुख्यमंत्री-मुख्यमंत्री फक्त आश्वासनं देऊन गेले,” असा हल्लाबोल त्यांनी केला.
Read Also :
- यात्रा आणि आंदोलन करणाऱ्या भाजप-मनसेला मुख्यमंत्र्यांनी फटकारले, म्हणाले…
- व्यस्त होते तरी परबांनी चौकशीला जायला हवे होते, चंद्रकांत पाटलांचे सूचक भाष्य
- ‘हे’ नियम पाळून पुणेकर साजरा करू शकतात गणेशोत्सव; पोलिसांकडून आचारसंहीता जाहीर
- इंदापूरच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत टेन्शन वाढले, वडेट्टीवारांचे थेट अजितदादांना आव्हान
- ईडीच्या चौकशीला परिवहन मंत्री अनिल परब गैरहजर, ईडीला पत्र पाठवून सांगितले कारण