बुलढाणा : सध्या राज्यात ठाकरे आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर टिका टिप्पणी करण्याची एकही संधी सोडतांना दिसत नाही. यातच रोज पत्रकार परिषदमधून संजय राऊत शिवसेना आमदारांवर टिकास्त्र सोडत आहेत. यातच लफग्यांना 2024 ला लोक रस्त्यावर पळवून पळवून हाणतील असा टोला राऊतांनी शिवसेनेच्या आमदारांवर लगावला आहे. त्यावर आता शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा..सकाळी मुश्रीफांनी,आता अनिल परबांनी सोमय्यांना अडचणीत पकडलं, थेट हक्कभंगाचा प्रस्ताव
कसब्यातील निकालानंतर महाविकास आघाडी ज्या गतीने पुढे जात आहे. त्याला खिळ घालण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्यामुळे सध्या राज्यात इडीच्या कारवाया केल्या जात आहेत. जे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करीत आहेत. ते सर्व लफंगे आहेत. अन् २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ह्या लफंग्यांना जनता रस्त्यावर पळवून पळवून हाणतील. असा इशारा खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांना दिला आहे.
हेही वाचा..“कांद्याचे भाव वाढले म्हणून दंगा करणारे लोक आज शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत”
त्यावर संजय गायकवाड यांनी पलटवार केला. संजय राऊतांना आम्ही काही महत्व देत नाहीत. कुठल्याही आमदार, खासदारांना मारण्यासाठी महाराष्ट्रात कोणीही पयदा झाला नाही. ज्यांचा हात आमच्या अंगावर पडेल. त्याचा हात तोडण्याची हिमंत आम्ही ठेवली आहे. त्यामुळे भडोत्री लोकांच्या भरवशावर संजय राऊतांनी भाषा वापरू नये. तसेच त्यांनी सुरक्षा सोडून बाहेर यावं. मग लफंगे काय असतात. ते आम्ही दाखवू. असा इशाराही संजय गायकवाड यांनी दिला.
Read also
- हेही वाचा..“काॅंग्रेसचे नेते काॅंग्रेसच्याच विरोधात निवडणुक आयोगाकडे जाणार”, काॅंग्रेस पक्षात मोठे बदल
- हेही वाचा..“सनातन धर्म म्हणजे वर्ण व्यवस्था, लगेच प्रत्येय आला” आव्हाडांचा भाजपवर निशाणा
- हेही वाचा…साहेबांवरचं प्रेम..! मुश्रीफांवर ईडीची धाड, कार्यकर्त्यानी डोकं आपटून घेतलं
- हेही वाचा…“नो पेन्शन नो वोट’ चा भाजपला धसका, जुनी पेन्शन योजनेबाबत सरकार सकारात्मक
- हेही वाचा..“शरद पवारांनी आयुष्यभर राजकीय स्वार्थासाठी जातीपातीत भांडण लावली”, भाजपची जहरी टिका