मुंबई : राज्यातील सर्व शासकीय, निमशाकीय कर्मचारी-अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसापासून राज्यात आंदोलन सुरू आहे. राज्यातील जवळपास सर्व शिक्षकांनी या मागणीसाठी ठिय्या आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. त्यावर आता सरकार साकारात्मक असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…हसन मुश्रीफांच्या घरावर २ महिन्यातून ED ची तिसरी धाड, कार्यकर्ते आक्रमक, पटोलेंची भाजपवर टिका
आम्ही जुन्या निवृत्तीवेतन योजनेसाठी नकारात्मक नाही. मात्र २००५ नंतर सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांची निवृत्ती अद्याप जवळ आलेली नाही. त्यासाठी अजून अवधी आहे. त्यामुळे त्यावर तोडगा काढता येईल. जूनी निवृत्तीवेतन योजना २००५ सालापासून बंद झाली आहे. ती पुन्हा लागू करावी, अशी कर्मचारी-अधिकारी यांची मागणी असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे. तसेच अधिकारी-कर्मचारी यांच्या संघटनांनी सरकारी तिजोरीवर आर्थिक भार न येता जूनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत काही शिफारशी सुचविल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा..“शरद पवारांनी आयुष्यभर राजकीय स्वार्थासाठी जातीपातीत भांडण लावली”, भाजपची जहरी टिका
दरम्यान, जुनी पेन्शन योजना लागू न केल्याने भाजपला याचा मोठा फटका बसला आहे. अलिकडेच झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत हा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यामुळे भाजपला पाच पैकी चार जागा गमवाव्या लागल्या तर एक जागेवर भाजपने विजय मिळवला. त्यामुळे नो पेन्शन नो वोट अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यावर सरकार विचार करण्याची शक्यता आहे.
Read also
- हेही वाचा…” त्या प्रकरणात सदा सरवणकरांना क्लिन चिट, ठाकरे गटाचा आंदोलन, सरवणकरांची प्रतिक्रिया
- हेही वाचा..““२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ह्या लफग्यांना जनता रस्त्यावर पळवून पळवून हाणतील”
- हेही वाचा..“शिवसेना ही ठाकरेंचीच, होती, आहे आणि राहणार”, संजय जाधवांचं मोठं विधान, अंधारेंची परभणीत जाहीर सभा
- हेही वाचा..१३ तारखेला राजभवनावर काॅंग्रेसचा ‘विराट मोर्चा’, राज्यातील ‘राजकारण’ तापणार ?
- हेही वाचा…“त्यांना सांगा की, आम्हाला गोळ्या घालून जावा”,हसन मुश्रीफांच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू, घरावर सकाळीच इडी धाड