परभणी : शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्याने ठाकरे गटातील नेत्यांकडून आता संपुर्ण महाराष्ट्र पालथा घातला जात आहे. ‘शिवगर्जना अभियान’ द्वारे अलिकडेच ठाकरे गटातील नेत्यांकडे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली. बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन सध्या ठाकरे गटातील नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांवर हल्लाबोल करीत आहेत. यातच ठाकरे गटाचे आमदार संजय जाधव यांनी महत्वपुर्ण विधान केलं आहे.
हेही वाचा..“कांद्याचे भाव वाढले म्हणून दंगा करणारे लोक आज शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत”
परभणी येथे ठाकरे गटाकडून कार्यकर्त्यांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचीही उपस्थिती होती. यावेळी संजय जाधव म्हणाले की, शिवसेना ही ठाकरेशिवाय होऊच शकत नाही. ज्यावेळी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. त्यावेळी आत्ताच्या मंत्र्यांचं लोळणं चालु असेल आणि त्यांनी शिवसेनेवर क्लेम करावं हे कुणालाच पटलेलं नाही. महाराष्ट्रातील कुठल्याही सामान्य माणसाला हे पटलेलं नाही. शिवसेना ही ठाकरेंचीच. होती, आहे आणि राहणार. त्यामध्ये काही दुमत नाही. असं संजय जाधव यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! “राष्ट्रवादीच्या विधान परिषद गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती”
त्याचबरोबर येत्या २४ तारखेला सुषमा अंधारे यांना परभणीत बोलवू. अन् परभणीत सुषमा अंधारे यांची जाहीर सभा घेऊ, म्हणजे सगळ्यांना समजेल. की शिवसेना नेमकी कुणाची आहे. तसेच परभणी विधानसभा मतदारसंघाच्या व्यासपीठावरून आपण ही सभा घेऊ. असंही संजय जाधव म्हणाले.
Read also
- हेही वाचा..१३ तारखेला राजभवनावर काॅंग्रेसचा ‘विराट मोर्चा’, राज्यातील ‘राजकारण’ तापणार ?
- हेही वाचा…“त्यांना सांगा की, आम्हाला गोळ्या घालून जावा”,हसन मुश्रीफांच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू, घरावर सकाळीच इडी धाड
- हेही वाचा…हसन मुश्रीफांच्या घरावर २ महिन्यातून ED ची तिसरी धाड, कार्यकर्ते आक्रमक, पटोलेंची भाजपवर टिका
- हेही वाचा..“शरद पवारांनी आयुष्यभर राजकीय स्वार्थासाठी जातीपातीत भांडण लावली”, भाजपची जहरी टिका
- हेही वाचा..सकाळी मुश्रीफांनी,आता अनिल परबांनी सोमय्यांना अडचणीत पकडलं, थेट हक्कभंगाचा प्रस्ताव