मुंबई : कांद्याचे भाव वाढले म्हणून दंगा करणारे लोक आज कांद्याचे भाव पडले असताना त्याकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत. त्याबाबत माहिती घेतली असता साधारणतः ७० हजारपर्यंतचा खर्च एक एकर कांदा उत्पादनासाठी येतो. याचा अर्थ कांदा पिकवायला एका किलोला ८-१० रूपये खर्च येतो आणि त्याच कांद्याला आज बाजारात तीन रुपये मिळत असतील तर त्या शेतकऱ्याने काय करायचे? शेतकऱ्याचा संसार कसा चालायचा? त्याने बँकेचे कर्ज कसे फेडायचे? असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
हेही वाचा…नाना पटोलेंना काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवणार? काय म्हणाले शिवाजीराव मोघे ?
कांदा प्रश्नाबाबत केंद्र व राज्य सरकारला आग्रही भूमिका घ्यायला लावणे हे तुमचे व माझे कर्तव्य आहे. कांद्याला पैसे जास्त कसे मिळतील याची योजना ठरवायला हवी आणि शेतकरी वाचवण्याची भूमिका घ्यायला हवी. आज याठिकाणी अनेक कार्यक्रम घेण्यात आले. निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे नामांतर बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्था असे करण्यात आले आहे. कवाद यांनी या संस्थेसाठी मोठे काम केले. म्हणून हा नामांतराचा निर्णय तुम्ही घेतला. याशिवाय इतर कार्यक्रम आज झाले. हा तालुका दुष्काळी असला तरी अनेक कर्तृत्ववान माणसे या तालुक्याने राज्याला दिली आहेत. गुलाबराव शेळके यांनी सहकारासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. राज्य सहकारी बँकेचे नेतृत्व आम्ही सगळ्यांनी ठरवून त्यांच्याकडे दिले होते आणि त्याठिकाणी गुलाबरावांनी अतिशय चांगले काम केले.गुलाबरावांच्या कुटुंबाने त्यांचे काम पुढे चालू ठेवण्याची भूमिका घेतली आहे, याचे मला समाधान वाटते. असंही शरद पवार म्हणाले.
हेही वाचा…“राज्यात १४ मार्चला मोठा राजकीय भुंकप”, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा
आज देशाची शेती, अर्थव्यवस्था एका संकटाच्या काळातून जात आहे. महाराष्ट्रात ऊस हे महत्त्वाचे पीक आहे. मला पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचे पत्र आले. मोठ्या कष्टांनी आमच्या भागातील जनतेने हा कारखाना उभारलाय. पण आमच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आज राज्य सरकार, केंद्र सरकार काही बघायला तयार नाही. आता तुम्हीच बसून काही मार्ग काढा असे त्या पत्रात म्हटले आहे. हे पत्र निलेश लंकेंनी मला दिले. मी त्यांना एवढेच सांगू इच्छितो की अजून तीन दिवसांनी संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे. दिल्लीला गेल्यावर कांदा, ऊस वा शेतकऱ्यांचे अन्य प्रश्न असतील त्यांची मांडणी संसदेत, केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मी व माझे सहकारी यांच्या वतीने केली जाईल आणि पारनेरच्या प्रश्नाबाबत विशिष्ट वेळ देऊन त्याकडे लक्ष दिले जाईल व मार्ग काढायचा प्रयत्न केला जाईल. असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..शेतकरी हीच आमची जात, जात विचारून शेतकऱ्यांना खते काय देताय? अजित पवारांचा संतप्त सवाल
आज कांद्याचा प्रश्न हा यक्षप्रश्न आहे. मी कृषिमंत्री असताना आम्ही कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणावर केली होती आणि तेव्हा दिल्लीत कांद्याचे भाव चढले. तेव्हा भाजपाचे काही खासदार गळ्यात कांद्याच्या माळा घालून संसदेत आले होते. ते म्हणाले की कांद्याचे भाव भयंकर वाढले आहेत, आम्हाला स्वयंपाक करता येत नाही, प्रपंच करता येत नाही, म्हणून तुमचा निषेध करायला आम्ही आलोय. त्यावेळी सभागृहात अध्यक्षांनी मला विचारणा केली की कांद्याच्या प्रश्नावर तुम्ही काय मार्ग काढणार ते सदनाला सांगा. मी त्यांना स्पष्ट सांगितले की काही मार्ग काढणार नाही. कांदा शेतकऱ्याचा कधीतरी दोन पैसे मिळतात आणि शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले म्हणून हे कांद्याच्या माळा गळ्यात घालून जे नाटक सुरू झालेय त्याला माझा पाठिंबा नाही. असंही ते म्हणाले.
Read also
- हेही वाचा…मोठी बातमी…! “राष्ट्रवादीच्या विधान परिषद गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती”
- हेही वाचा…“खेडच्या विराट सभेतील ‘उद्धव’ दर्शनानंतर भाजपने हिंस्र नखं बाहेर काढली”
- हेही वाचा..सोमय्यांना जोर चा झटका, फासे पलटले, मुश्रीफांवरील आरोप भोवले, चौकशीचे दिले आदेश
- हेही वाचा..“शरद पवारांनी महाविकास आघाडीकडून बाहेर पडावं,” रामदास आठवले
- हेही वाचा..“बच्चू कडूंची गद्दारी पक्षासोबत होऊ शकते, सर्व सामान्यांशी नाही”