मुंबई : रासायनिक खते घेताना पॉस मशीनवर शेतकऱ्यांच्या जातीची विचारणा केली जात असल्याने सांगलीतील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. रासायनिक खत खरेदी करताना अगोदर जात विचारली जात आहे. यावरून सभागृहात काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाईंट ऑफ व्हीच्या माध्यामातून राज्य सरकारला सवाल केला. त्यावर सभागृहात एकच गोंधळ उडाला. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावर आता भाजपकडून पलटवार करण्यात आला आहे.
हेही वाचा..“शरद पवारांनी महाविकास आघाडीकडून बाहेर पडावं,” रामदास आठवले
सांगलीत रासायनिक खते घेताना पॉस मशीनवर शेतकऱ्यांच्या जातीची उल्लेख केल्यानंतर राज्यातील राजकीय नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातच शेतकऱ्यांना जात विचारणं हे चुकीचं आहे. आजपर्यंत देशाच्या किंवा राज्याच्या इतिहास असा प्रकार घडला नव्हता. जर शेतकऱ्यांना जात विचारली जात असेल तर याचे कारण काय ? हे पुढे आलं पाहिजे. यासंदर्भात माहिती आम्ही घेतो आहे. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..“बच्चू कडूंची गद्दारी पक्षासोबत होऊ शकते, सर्व सामान्यांशी नाही”
जिथे जात शब्द आला. तिथे शरद पवार सक्रिय होतात. पवारांनी आयुष्यभर राजकीय स्वार्थासाठी जातीपातीत भांडण लावले. आजही त्यांच्या डोळ्यावर जातीयवादाचा चष्मा तसाच आहे. म्हणूनच कृषिमंत्रालयाच्या संकेतस्थळावर प्रवर्ग विचारण्यात आला असता शरद पवारांना त्यात जात दिसली. पवार साहेब तुम्ही कृषीमंत्री असताना खतांवर सबसिडी मिळत नव्हती. आता सबसिडी मिळत आहे. त्याचा तुम्हाला त्रास होतंय. शेतकऱ्यांना तुम्ही काही दिलं नाही, आम्ही देतोय तर तुम्हाला त्रास का होतोय? तुमचा स्वभाव गुण जातीपातीच राजकारण करून स्वत: ची राजकीय पोळी भाजून घेण्याचा आहे. असं भाजपने म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा..सकाळी मुश्रीफांनी,आता अनिल परबांनी सोमय्यांना अडचणीत पकडलं, थेट हक्कभंगाचा प्रस्ताव
- हेही वाचा..“कांद्याचे भाव वाढले म्हणून दंगा करणारे लोक आज शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत”
- हेही वाचा…मोठी बातमी…! “राष्ट्रवादीच्या विधान परिषद गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती”
- हेही वाचा…“खेडच्या विराट सभेतील ‘उद्धव’ दर्शनानंतर भाजपने हिंस्र नखं बाहेर काढली”
- हेही वाचा..सोमय्यांना जोर चा झटका, फासे पलटले, मुश्रीफांवरील आरोप भोवले, चौकशीचे दिले आदेश