मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून राज्यात एव्हाना देशात विरोधकांमधील नेत्यांच्या घरावर धाडी पडत आहेत. सध्याच्या सरकारला जो कुणी सवाल करीत आहेत. त्यांचा आवाज दाबण्याचा काम भाजपकडून सातत्याने केला जात आहे. असा आरोप विरोधक भाजपवर करीत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर येत्या १३ मार्चला काॅंग्रेस राजभवनावर धडक मोर्चा काढणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! “राष्ट्रवादीच्या विधान परिषद गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती”
सरकारकडून ज्या पद्धतीने ईडी आणि सीबीआयचा वापर केला जात आहे. त्याच्याविरोधात राजभवनावर मोर्चा काढणार असल्याचं काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. “सध्या राज्यात विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. १३ तारखेला काॅंग्रेसचा विराट मोर्चा राजभवनावर काढणार आहे. सध्या देशात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी, गरिबांचे प्रश्न आहेत. असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार आहे.” असं नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा…“खेडच्या विराट सभेतील ‘उद्धव’ दर्शनानंतर भाजपने हिंस्र नखं बाहेर काढली”
दरम्यान, आज राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर इडीचे ४ अधिकारी दाखल झालेत. गेल्या दोन महिन्यातील ३ री इडीची धाड मुश्रीफांच्या घरावर पडली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मुश्रीफांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केला असून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आहे.
Read also
- हेही वाचा…“त्यांना सांगा की, आम्हाला गोळ्या घालून जावा”,हसन मुश्रीफांच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू, घरावर सकाळीच इडी धाड
- हेही वाचा…हसन मुश्रीफांच्या घरावर २ महिन्यातून ED ची तिसरी धाड, कार्यकर्ते आक्रमक, पटोलेंची भाजपवर टिका
- हेही वाचा..“शरद पवारांनी आयुष्यभर राजकीय स्वार्थासाठी जातीपातीत भांडण लावली”, भाजपची जहरी टिका
- हेही वाचा..सकाळी मुश्रीफांनी,आता अनिल परबांनी सोमय्यांना अडचणीत पकडलं, थेट हक्कभंगाचा प्रस्ताव
- हेही वाचा..“कांद्याचे भाव वाढले म्हणून दंगा करणारे लोक आज शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत”