मुंबई : रासायनिक खते घेताना पॉस मशीनवर शेतकऱ्यांच्या जातीची विचारणा केली जात असल्याने सांगलीतील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. रासायनिक खत खरेदी करताना अगोदर जात विचारली जात आहे. यावरून सभागृहात काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाईंट ऑफ व्हीच्या माध्यामातून राज्य सरकारला सवाल केला. त्यावर सभागृहात एकच गोंधळ उडाला. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी एक सुचक ट्विट केलं आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! “राष्ट्रवादीच्या विधान परिषद गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती”
सनातन धर्म की काय… शेतकऱ्यांना जात विचारून खत वाटप…. हेच मी सांगत होतो. सनातन धर्म म्हणजे वर्ण व्यवस्था… लगेच प्रत्येय आला.. असा ट्विट करत जितेंद्र आव्हाडांनी करत भाजपवर निशाणा साधला. अहो, शेतकरी हीच आमची जात आहे… खते खरेदी करताना शेतकऱ्याना जात कसली विचारताय? असा संतप्त सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला सभागृहात विचारला. सांगलीत रासायनिक खते खरेदी करताना जात विचारली जात असल्याचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला व जातिवाद निर्माण करणार्या सरकारला खडेबोल सुनावले. रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात का सांगावी लागत आहे. ती का नोंदवावी लागते आहे, असा सवाल त्यांनी केला. ई पॉस सॉफ्टवेअर मशीनमध्ये जातीचा रकाना टाकण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्यांना जात सांगावी लागत असून जातीचे लेबल लावण्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडता कामा नये, असेही अजित पवारांनी सरकारला ठणकावून सांगितले.
हेही वाचा…“खेडच्या विराट सभेतील ‘उद्धव’ दर्शनानंतर भाजपने हिंस्र नखं बाहेर काढली”
शेतकरी वर्गात वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक असतात. त्यांना जात विचारून खत देणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारने वर्णभेदाची किती आग्रही भूमिका घेतली आहे हे या भूमिकेतून निष्पन्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केला. शेतकऱ्याला जात विचारण्याचे कुठलेही कारण नाही. त्यामुळे या गोष्टीचा करू तेवढा निषेध कमी आहे. सरकारने ही भूमिका रद्द करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितपणे विधानसभेत आपली भूमिका मांडेल, असे ते म्हणाले. जातीचा, खताचा आणि शेतीचा कोणताही संबंध नसताना शेतकऱ्यांच्या जातिनिहाय संख्येचा आढावा घेऊन राजकारणातील पुढील पावले टाकण्याचे सत्ताधाऱ्यांचे धोरण असावे, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
सनातन धर्म की जय …..
शेतकर्यांना जात विचारुन खत वाटप ….
हेच मी सांगत होतो … सनातन धर्म म्हणजे वर्ण व्यवस्था …. लगेच प्रत्येय आला ..— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 11, 2023
Read also
- हेही वाचा…साहेबांवरचं प्रेम..! मुश्रीफांवर ईडीची धाड, कार्यकर्त्यानी डोकं आपटून घेतलं
- हेही वाचा…“नो पेन्शन नो वोट’ चा भाजपला धसका, जुनी पेन्शन योजनेबाबत सरकार सकारात्मक
- हेही वाचा..“शरद पवारांनी आयुष्यभर राजकीय स्वार्थासाठी जातीपातीत भांडण लावली”, भाजपची जहरी टिका
- हेही वाचा..सकाळी मुश्रीफांनी,आता अनिल परबांनी सोमय्यांना अडचणीत पकडलं, थेट हक्कभंगाचा प्रस्ताव
- हेही वाचा..“कांद्याचे भाव वाढले म्हणून दंगा करणारे लोक आज शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत”