मुंबई : मातोश्री बाहेर हनुमान चालिसा वाचण्याचं आवाहन केल्यानंतर खासदार नवनीत राणा यांच्यासह माझ्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. यासंदर्भात त्यावेळीचे आयुक्त संजय पांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून आम्हाला विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. यासंदर्भात आज मुंबईच्या नवीन आयुक्तांना भेटलो आहे. असं आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे.
“तर माझ्यावर बिनधास्त कारवाई करा,” अब्दुल सत्तार यांचं ओपन चॅलेंज
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात भरात अडीच वर्षात गेले नाहीत. एवढ्या एक महिन्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दौरे केले आहेत. त्यांनी तालुका, जिल्हा. तसेच गाव पातळीवर जाऊन लोकांशी संवाद साधला आहे. त्यामुळे हे शिंदे सरकार पुढे 25 वर्ष चालणार आहे. मंत्रिमंडळ विस्तार होणारच आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्ष महाराष्ट्र संभाळलं आहे. त्यामुळे सर्व गोष्टींशी चर्चा करून विस्तार होईल, असं देखील रवी राणा यांनी म्हटलं आहे.
“भाजपची सत्ता जसजशी आली, तसतशी प्रगतीची चाकं उलटी फिरायला लागली”
सरकार कुठेही थांबलेलं नाही. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर शिंदे सरकार अजून जोराने चालणार आहे. तसेच बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर सध्या टीईटी घोटाळ्या प्रकरणी जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावर बोलताना म्हणाले की, त्यावर एकनाथ शिंदे यावर सविस्तर चौकशी करून त्यावर निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
Read also
- “मंत्रिमंडळ विस्ताराचं कोणतंही निमंत्रण आलं नाही”; अजित पवारांचं स्पष्टीकरण
- आजोबा भिजले, नातूही भिजले पण काय उपयोग? ‘त्या’ फोटोवरून खोतांचा रोहित पवारांना टोला
- मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर मुहुर्त ठरला.. उद्या शपथविधी होणार?
- “अगोदर जहरी टिका त्यानंतर कौतूक”; रोहित पवारांचं मुख्यमंत्र्याबाबत नेमकं चाललंय काय?
- मंत्रीपद अन् महामंडळासाठी महादेव जानकर आग्रही; शिंदे सरकारमधील मंत्रीपदे अजूनही गुलदस्त्यात