मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकारण विविध मुद्यामुळे चांगलचं तापलं आहे. विरोधक सत्ताधारी पक्षावर सातत्याने टिका करीत आहेत. तर सत्ताधारी पक्षांकडून देखील प्रत्युत्तर दिलं जात आहे. यातच आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी उडी घेतली आहे. त्यांनी मागील सरकार आणि आताचं सरकार यामधील फरक सांगितला आहे.
ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी राज्य सरकारने काय केले सांगा – चंद्रकांत पाटील
भाजप सत्तेत असताना बुलेट ट्रेन, हायपर लूप, समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार अशा गोष्टीवर चर्चा असायचा होत असायच्या. पंरतु आता महाराष्ट्रात चर्चा असते ती देशमुख, मलिक कांड, खंडणी, हाणामारी, घरकोंबडा, पेपर घोटाळा, आरक्षणाचा बट्याबोळ अशा विषयावर असते. असं म्हणत जोरदार हल्ला चढवला आहे. आताच शेतकरी लढणार आणि आताच इतिहास घडणार असंही त्यांनी सांगितलं आहे.
राष्ट्रवादीला लागले हिंदुत्वाचे वेध? सहकुटुंबासह रोहित पवार आयोध्यत दाखल; राज्यात एकच चर्चा
रयत क्रांती संघटना सध्या संपुर्ण महाराष्ट्र दौरा करीत आहेत. यामध्ये ते विविध भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. शेतकरी आत्महत्या ह्या राज्यानं फार पाहिल्या पण शेतकऱ्याचा आसूड अजून पाहिला नाही. हा आसूड बेजबाबदार सरकारी धोरणांवर ओढत, रयत क्रांती संघटनेच्या यशस्वी कोकण दौऱ्यानंतर झंझावाती दुसरा टप्पा धडकणार थेट खान्देश, विदर्भ, मराठवाडा, आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा राज्यव्यापी झंझावती दौरा होणार असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंचा भावाला धक्का; कल्याण डोंबिवलीतील मनसे कार्यकर्ते शिवसेनेत
दरम्यान, महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांच्या पाठीमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठीमागे लागला आहे. यातील काही नेत्यांवर इडीची कारवाई झाली आहे. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक मनी लॉण्डिंग प्रकरणी तुरूंगात आहेत. तसेच भाजप नेते किरीट सोमय्यांनी आघाडीतील 14 मंत्र्यांची नावे उघड केली आहेत. त्यांच्यावर देखील आगामी काळात केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण एका वेगळ्याच दिशेने जात आहे.
Read also:
- राज ठाकरेंनंतर मुख्यमंत्री ठाकरेंची औरंगाबादेत सभा; परवानगीवरुन जोरात राजकारण तापणार?
- “राज ठाकरेंच्या भोंग्याचा आता झाला ठेंगा”; गुलाबराव पाटलांनी उडवली खिल्ली
- “भोंग्यांवर कसले बोलताय महागाईवर बोला”; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
- राज्याचे उपमुख्यमंत्री अॅक्शन मोडवर; भाजप दिला दणका, ‘त्या’ नेत्याचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’
- स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी “यशस्वी-स्पर्धा परीक्षा संकल्प”; लहु बालवडकर यांचा स्तुत्य उपक्रम