मुंबई : इंडियाची उद्या मुंबईत बैठक होत असून त्याची माहिती आज महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन दिलीय. इंडिया आघाडीच्या याअगोदर दोन बैठका झाल्या असून मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या बैठकीत इंडिया आघाडीचे २६ मित्र पक्ष होते. आता ते २८ झाले आहे. अशी माहिती काॅंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलीय. तर या बैठकीतून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भाजपसह अजित पवार गटावर जोरदार हल्ला चढवला आहे.
हेही वाचा…शिंदेंसोबत गेलेल्या ४० आमदारांना सुषमा अंधारे राखी बांधणार, म्हणाल्या, “किमान एक तरी..,”
देशाच्या पंतप्रधानांनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत. त्यानंतर आमच्या सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. आता यासंदर्भात केंद्र सरकारने चौकशी करावी. आणि वस्तूस्थिती काय आहे ? याची माहिती मोदींनी जनतेसमोर ठेवावी. असं शरद पवारांनी सांगितलं आहे. तसेच देशात किंवा मित्र पक्षात कोणताही संभ्रम नाहीय. येत्या निवडणुकांमध्ये बंडखोरांना त्यांची योग्य ती जागा दाखविली जाईल. अशी माहिती शरद पवारांनी अजित पवार भेटीच्या चर्चांवर दिली.
हेही वाचा…“..तर भुजबळांना तुरूंगात जावं लागलं असतं,” शरद पवारांनी भुजबळांना दिलं प्रत्युत्तर
दरम्यान, इंडियाची बैठक पुढे पुढे जाईल, तसं तसं भाजप सिलिंडरच्या किमंती शुन्यावर आणेल, कारण केंद्र सरकारचं सध्या गॅसवर आलं आहे. असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. उद्या इंडियाची बैठक मुंबईत होत असून त्यापुर्वी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टिका केली.
READ ALSO :
हेही वाचा…पंतप्रधानपदाची इंडियाकडे अनेक पर्याय, पण भाजपात मोदींशिवाय पर्याय आहेत का ?
हेही वाचा…“इंडियाची बैठक झाली अन् गॅसच्या किमंती कमी झाल्या, कारण केंद्र सरकारचं गॅसवर,” ठाकरेंचा हल्लाबोल
हेही वाचा…2024 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी विरूद्ध अरविंद केजरीवाल, इंडियाच्या बैठकीपुर्वी आपची मोठी घोषणा
हेही वाचा…“ब्रम्हदेव जरी खाली आला तरी २०२४ पर्यंत मंत्रिपद घेणार नाही,” बच्चू कडूंचं मोठं विधान
हेही वाचा…शेतकरी नेत्याचा राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश, शरद पवारांची ताकद वाढली