नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील इंडियाची बैठक मुंबईत उद्या होत आहे. याची जबाबदारी महाविकास आघाडीकडे देण्यात आली असून त्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. यातच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी एनडीएकडून पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदीच राहणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. यातच आता इंडियाच्या तिसऱ्या बैठकीच्याआधीच आपने मोठी घोषणा केली आहे.
हेही वाचा…अजित पवारांकडून भाजप नेत्यांची कोंडी, फडणवीसांनी अजित पवारांना दिला मोठा दणका
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पंतप्रधान पदी आपकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नावाची घोषणा केली आहे. आम आदमी पार्टीची अलिकडेच बैठक पार पडली. या बैठकीत आपच्या नेत्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तोब केला आहे. याची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरूय.
हेही वाचा…“ट्रीपल इंजिन सरकारमधील इंजिन एकमेकांना आता धक्के मारताहेत”, वडेट्टीवारांनी शिंदेंना डिवचलं
इंडियाची बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत पार पडणार आहे. इंडिया आघाडीची मुंबईत होणारी तिसरी बैठक आहे. या बैठकीपुर्वीच आम आदमी पार्टीने अरविदं केजरीवाल यांची इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी घोषणा केली आहे. यावर राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका कक्कर यांनी ही माहिती दिलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“ब्रम्हदेव जरी खाली आला तरी २०२४ पर्यंत मंत्रिपद घेणार नाही,” बच्चू कडूंचं मोठं विधान
हेही वाचा…शेतकरी नेत्याचा राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश, शरद पवारांची ताकद वाढली
हेही वाचा…शिंदेंसोबत गेलेल्या ४० आमदारांना सुषमा अंधारे राखी बांधणार, म्हणाल्या, “किमान एक तरी..,”
हेही वाचा…“..तर भुजबळांना तुरूंगात जावं लागलं असतं,” शरद पवारांनी भुजबळांना दिलं प्रत्युत्तर
हेही वाचा…महायुतीत चाललंय काय? फडणवीस अन् अजित पवारांमध्ये संघर्ष, पण यात ‘विखें’चा झाला गेम