मुंबई : अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याची माहिती समोर येत आहे. यातच एनसीडीसीने मंजूर केलेले कर्ज मिळवण्यासाठी अजित पवार यांच्याकडून जाचक अटी घातल्या होत्या. यामुळे भाजपच्या कारखांनाना मोठा फटका बसला होता. यानंतर भाजपच्या सर्व नेत्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! “ठाकरेंच्या ‘या’ शिलेदाराला पक्षात येण्यासाठी १०० कोटींची ऑफर” ,?
कारखान्यांच्या कर्जासाठी संचालकांनी वैयक्तिक सामुहिक जबाबदारीचे हमीपक्ष देण्याची अट अजित पवारांनी घातली होती. यामुळे भाजपच्या अनेक महत्वाच्या नेत्यांना याचा फटका बसण्याची शक्यता होती. या सर्व जाचक अटी देवेंद्र फडणवीसांनी रद्द केल्या आहेत. तसेच यापुढे आता अजित पवार यांनी कुठल्याही फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाईल. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे जाईल. असा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा…दोन्ही उपमुख्यमंत्री अन् मुख्यमंत्र्यामध्ये भांडण, सर्वसामान्यांचे सरकार असे काम करते का ? वडेट्टीवारांचा सवाल
अजित पवारांनी घालून दिलेल्या अटीनंतर फडणवीसांनी ज्या नेत्यांच्या कारखान्यांना दिलासा दिला त्यात भाजपच्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये विजय सिंह मोहिते पाटिल यांच्या शंकर सहकारी साखर कारखान्याला एनसीडीसी कडून ११३.४२ कोटी कर्ज मंजूर झालं. त्यानंतर हर्षवर्धन पाटलांच्या कर्मयोगी शंकरारावजी पाटील इंदापुर येथील कारखान्याला १५० कोटीच कर्ज मंजूर झालं होतं. त्याचबरोबर त्यांच्याच इंदापूर येथील निरा-भिमा साखर कारखान्याला ७५ कोटी मंजूर झालं आहे.
हेही वाचा…“मोदींनी निवडणुकीपुर्वी पहिला धक्का, ‘रासप’ एनडीएतून बाहेर, जानकरांचा पक्ष स्वबळावर निवडणुका लढवणार”
त्याचसोबत भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या लातूर येथील शेतकरी साखर कारखान्याला एनसीडीसीकडूून ५० कोटी, रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील रामेश्वर सहकारी साखर कारखान्याला ३४.७४ कोटी कर्ज मंजूर झालं आहे. तसेच खासदार धनंजय महाडिक यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्याला एनडीसीकडून १२६. ३८ कोटीचं कर्च मंजूर झालं आहे. या सर्व नेत्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात नव्या अटी लागू केल्यानंतर सारख कारखाने असलेल्या भाजप नेत्यांची कोंडी झाली. यामध्ये हर्षवर्धन जाधव, रावसाहेब दानवे, धनंजय महाडिक यांच्या कारखान्यांचा समावेश आहे. आता नव्या अटींमुळे रावसाहेब दानवेंच्या नेतृत्वाखालीली शिष्टमंडळाने काल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवारांनी घेतलेले निर्णय त्यानंतर मागे घेण्यात आले. शासन निर्णय मागे घेतल्यानंतर अजित पवारांना फडणवीसांनी दे धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरूय.
READ ALSO :
हेही वाचा…“ट्रीपल इंजिन सरकारमधील इंजिन एकमेकांना आता धक्के मारताहेत”, वडेट्टीवारांनी शिंदेंना डिवचलं
हेही वाचा…महायुतीत ठिणगी पेटली..,! फडणवीसांचा अजिदादांना दे धक्का, ‘तो’ निर्णय बदलला, भाजप नेत्यांना मोठा दिलासा
हेही वाचा…घड्याळ आणि पक्षनाव घेण्यासाठी इलेक्शन कमिशनमध्येही फिक्सींग, आव्हाडांचा मोठा दावा, पुरावाही दिला
हेही वाचा…“१५ कोटीचा फंड आणि पाच कोटीच्या कॅशवर ‘या’ माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडली”
हेही वाचा…“..त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतरही नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदी दिसतील”