मुंबई : शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीसारखीच राष्ट्रवादीत देखील मोठी फुट पडली. यानंतर निवडणुक चिन्ह आणि पक्ष नावासाठी दोन्ही गटाची लढाई निवडणुक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात गेली. यानंतर राष्ट्रवादीचं प्रकरण देखील निवडणुक आयोगात गेल्याची माहिती समोर येत आहे. परंतु राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या निवडणुक आयोगाकडे गेलेल्या वादाचा निकाल ३० सप्टेंबरपर्यंत लागेल असा दावा अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी केला आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…“56 इंचाची छाती असलेले पंतप्रधानांना चीन घाबरत नाही का?” वडेट्टीवारांचा मोदींना सवाल, चीनचा विषय तापला
प्रफुल पटेल म्हणतात की राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष आणि त्याची निशाणी ही आम्हालांच मिळणार आणि ती देखील ३० सप्टेंबरच्या अगोदर. आतापर्यंत मॅच फिक्सींग ऐकलं होतं. पण, इलेक्शन कमिशनला पण फिक्सींग होतं याचा हा सर्वात मोठा पुरावा असल्याचं आव्हाडांनी म्हटलं आहे. तसेच या देशामध्ये संस्थांचे स्वांतत्र्य जिवंत आहे की नाही हाच प्रश्न विचारावासा वाटतो. इलेक्शन कमिशनची भूमिका या अशा वक्तव्यांमुळे संशयास्पद वाटते. असंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा…“वडेट्टीवारांची काॅंग्रेसच्या माजी नगरसेवकांसोबत मोठी बैठक, राजकीय हालचाली सुरूय”
दरम्यान, अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारलं. त्यानंतर अजित पवार गटाने थेट राष्ट्रवादीवर दावा ठोकला. यासाठी आता निवडणुक आयोगात दोन्ही बाजूच्या गटाने याचिका दाखल केली आहे. त्यावर आता काहीच महिन्याच निर्णय होण्याची शक्यता आहे. परंतु त्याआधीच निवडणुक चिन्ह आणि पक्ष नाव आम्हालाच मिळणार असल्याचं अजित पवार गटाकडून सांगण्यात येत आहे.
प्रफुल पटेल म्हणतात की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याची निशाणी ही आम्हांलाच मिळणार आणि ती देखिल 30 सप्टेंबरच्या अगोदर.
आतापर्यंत मॅच फिक्सींग ऐकलं होतं. पण, इलेक्शन कमिशनला पण फिक्सींग होतं याचा हा सर्वात मोठा पुरावा. या देशामध्ये संस्थांचे स्वातंत्र्य जिवंत आहे की नाही…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 29, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“१५ कोटीचा फंड आणि पाच कोटीच्या कॅशवर ‘या’ माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडली”
हेही वाचा…“..त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतरही नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदी दिसतील”
हेही वाचा…मोठी बातमी…! “ठाकरेंच्या ‘या’ शिलेदाराला पक्षात येण्यासाठी १०० कोटींची ऑफर” ,?
हेही वाचा…दोन्ही उपमुख्यमंत्री अन् मुख्यमंत्र्यामध्ये भांडण, सर्वसामान्यांचे सरकार असे काम करते का ? वडेट्टीवारांचा सवाल
हेही वाचा…“मोदींनी निवडणुकीपुर्वी पहिला धक्का, ‘रासप’ एनडीएतून बाहेर, जानकरांचा पक्ष स्वबळावर निवडणुका लढवणार”