मुंबई : राज्यात मागील काहि दिवसापासून राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्यव्यावरून राज्यात मोठ्या प्रमाणात गदारोळ, आंदोलने केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात महिलांविषयी होणाऱ्या बेताल आणि आक्षेपार्ह वक्तव्याला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौजिया खान यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे महामहिम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
राज्य सरकारचे आणखी एक अपयश..! सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांवर टिकास्त्र
स्त्री सशक्तीकरण चळवळीत महाराष्ट्र राज्याचा मोठा वाटा आहे. त्यामुळे याच राज्याच स्त्री सन्मान होणार नसेल तर ही खेदाची बाब आहे. अशा अपप्रवृत्तीला मूळापासून हटविळ्यासाठी तसेच राज्यातील संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींना महिलांविषयी वक्तव्य करताना काही मर्यादा घालण्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी या महिलांनी राज्यपालांकडे करत निवेदन दिलं. यावेळी राज्यसभा खासदार जया बच्चन, खासदार प्रियांका चतुर्वेदी, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, आमदार मनिषा कायंदे, आमदार सुमनताई पाटील, आमदार आदिती तटकरे, रा. काँ. मुंबई विभागीय युवती अध्यक्ष अदिती नलावडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यात दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय..! बच्चू कडूंची 25 वर्षाच्या मागणीला यश
स्त्रीयांचा सन्मान करून स्त्री शक्तीला अभिमानाने मिरवणारी आपली भूमी म्हणजे महाराष्ट्र आहे. स्त्रीयांचा आदर करणे हे इथल्या घराघरात केले जाणारे संस्कार आहेत. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई, होळकर, रमाई यांच्या विचारांवर चालणारा महाराष्ट्र महिलांबाबत देशातील सर्वात अग्रेसर असल्याचे सर्वश्रूत आहे. महिलांचे शिक्षण, सुरक्षितता, नेतृत्व हि महाराष्ट्राची ओळख आहे. परंतु महाराष्ट्राच्या या परंपरेला काळिमा फासण्याचं काम सध्या दिसत आहे. असं निवेदनात म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाडांना काही तासातच जामीन मंजूर..! राष्ट्रवादीचा मोठा जल्लोष
तसेच महिलांबाबत आक्षेपार्ह शब्द उच्चारून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या व्यक्तींना महाराष्ट्राच्या संविधानिक पदावर राहता येऊ नये यासाठी तरतुद होणे आवश्यक आहे. तसेच अशी हमी त्यांनी ग्रहण करताना घेणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
Read also
- “शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करावं”; चंद्रशेखर बावनकुळे
- “लोकशाहीचा खून करणारा इडी सरकार”; आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपाली पाटलांचा हल्लाबोल
- “72 तासाच 2 गुन्हे… आता आमदारीकाचाच राजीनामा देतो”; जितेंद्र आव्हाडांचा मोठा निर्णय
- “72 तासाच 2 गुन्हे… आता आमदारीकाचाच राजीनामा देतो”; जितेंद्र आव्हाडांचा मोठा निर्णय
- मोठी बातमी…! जितेंद्र आव्हाडांना अटक करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची बदली