मुंबई : हर हर महादेव चित्रपटाच्या शो बंद पाडण्याच्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली. त्यांना काल दुपारी अटक करून ठाण्यातील वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये रात्रभर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करून त्यांच्या जामानीवर सुनावणी करण्यात आली. अन् त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. मात्र यातच जितेंद्र आव्हाड यांना अटक करणाऱ्या डिसीपीची आता बदली करण्यात आली आहे.
“महाराष्ट्राच्या हातून अजून एक प्रकल्प गेला, विरोधकांचा सरकारवर निशाणा
काल जितेंद्र आव्हाड यांना डीसीपी विनय कुमार राठोड यांनी अटक केली होती. जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषदे घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्याचबरोबर हर हर महादेव चित्रपटात कशा पद्धतीने छत्रपतींचा इतिहास चुकीचा दाखवला. त्याचे व्हि़डीओ देखील त्यांनी दाखवले. तसेच ठाण्याच्या वर्तक नगरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा यामध्ये काहीही संबंध नसून चाणक्याचा डाव फसला असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केला.
“राष्ट्रवादीचे नेते सत्तेशिवाय राहु शकत नाही, अनेक नेते भाजप अन् शिंदे गटात येणार”
त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना अटक केलेल्या डिसीपी विक्रम कुमार राठोड यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण वेगळ्याच वळणावर गेलं आहे. यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ठाण्याच्या वर्तक नगरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा या प्रकरणाशी शुन्य संबंध आहे. त्यांची हतबलता मला प्रत्येक मिनिटाला समजत होती. त्यांच्या डोळ्यांमधून फक्त अश्रू येणं बाकी होतं. बाकी सगळे हतबल होते. कारण असं कुणाला अटक करत नाही. असं आव्हाड म्हणाले होते.
Read also
- राज्य सरकारचे आणखी एक अपयश..! सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांवर टिकास्त्र
- राज्यात दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय..! बच्चू कडूंची 25 वर्षाच्या मागणीला यश
- जितेंद्र आव्हाडांना काही तासातच जामीन मंजूर..! राष्ट्रवादीचा मोठा जल्लोष
- राजकारण पुन्हा तापलं…! जितेंद्र आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी..!
- अन् राहुल गांधींसमोरच मांडला कुस्तीचा फड..! कोल्हापुरचे रांगडे गडी एकमेकांत लढले