मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड पुन्ह एकदा वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. रविवारी ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोरून वाट काढताना आव्हाडांनी एका महिलेला बाजूला केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आव्हाडांनी आता आमदारकीचा राजीनामा देत असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे.
अन् राहुल गांधींसमोरच मांडला कुस्तीचा फड..! कोल्हापुरचे रांगडे गडी एकमेकांत लढले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकार्पण सोहळा आटोपून निघत होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या गाडीभोवती लोकांची प्रचंड गर्दी जमा झाली. तेथून वाट काढत जितेंद्र आव्हाड गर्दीमधून बाहेर पडत होते. मात्र त्यांच्यासमोरील एका महिलेला त्यांनी बाजूला करत आव्हाड त्या गर्दीमधून बाहेर पडले. त्यानंतर आव्हाड यांनी चारचौघांमध्ये आपल्याला अपमानित केल्याचा आरोप करत महाराष्ट्र महिला आयोगाच्या सदस्या आणि भाजपच्या पदाधिकारी रिदा रशीद यांनी ट्विटवर व्हिडीओ शेअर करत आव्हांडावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
“महाराष्ट्राच्या हातून अजून एक प्रकल्प गेला, विरोधकांचा सरकारवर निशाणा
त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्यावर सध्या पोलिसी अत्याचार केला जात असून या अत्याचाराविरूद्ध लढणार असं म्हणत त्यांनी थेट आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, पोलीसांना माझ्याविरूद्ध 72 तासात 2 खोटा गुन्हा दाखला आहे. तोही 354 कलमा अंतर्गत. मी ह्या पोलीसी अत्याचाराविरूद्ध लढणार असून मी माझ्या आमदाराकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या. उघड्या डोळ्यांनी मी बघू शकत नाही. असं आव्हाडांनी म्हटलं आहे.
“राष्ट्रवादीचे नेते सत्तेशिवाय राहु शकत नाही, अनेक नेते भाजप अन् शिंदे गटात येणार”
दरम्यान, एक दिवसापुर्वीच जितेंद्र आव्हाड यांच्यावर हर हर चित्रपटासंदर्भात पोलिसांनी अटक केली होती. त्यांना एक दिवस तुरूंगात ठेऊन त्यानंतर त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यातच आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळातील राज्यातील राजकीय वातावरण कशापद्धतीने असणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- मोठी बातमी…! जितेंद्र आव्हाडांना अटक करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची बदली
- राज्य सरकारचे आणखी एक अपयश..! सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांवर टिकास्त्र
- राज्यात दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय..! बच्चू कडूंची 25 वर्षाच्या मागणीला यश
- जितेंद्र आव्हाडांना काही तासातच जामीन मंजूर..! राष्ट्रवादीचा मोठा जल्लोष
- राजकारण पुन्हा तापलं…! जितेंद्र आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी..!