मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर आता एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर 72 तासाच 2 खोटे गुन्हे दाखल केल्याने आता राजीनामा देत असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. त्यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून टिका केली आहे.
जितेंद्र आव्हाडांना काही तासातच जामीन मंजूर..! राष्ट्रवादीचा मोठा जल्लोष
रविवारी ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोरून वाट काढताना आव्हाडांनी एका महिलेला बाजूलं केलं. त्यानंतर आव्हाड यांनी चारचौघांमध्ये आपल्याला अपमानित केल्याचा आरोप करत महाराष्ट्र महिला आयोगाच्या सदस्या आणि भाजपच्या पदाधिकारी रिदा रशीद यांनी ट्विटवर व्हिडीओ शेअर करत आव्हांडावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
राजकारण पुन्हा तापलं…! जितेंद्र आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी..!
जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. याचा अर्थ लोकांना समजला आहे. आव्हाडांना बदनाम करण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न केला जात आहे. असा आरोप जयंत पाटलांनी केला आहे. तसेच पुणे शहर उपाध्यक्ष रूपाली पाटलांनी देखील शिंदेंचा समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या की, यंत्रणेचा गैरवापर, हिटलरशाही सराकर इडी सरकारचा जाहीर निषेध करते. तुमच्या मंत्रिमंडळातील मंत्री गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार यांनी महिलांना शिवीगाळ केली. त्यावर गुन्हा दाखल नाही आणि कार्यक्रमात गर्दीत महिलेला बाजूला केले म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. असं म्हटलं आहे. त्याचबरोबर लोकाशाहीचा खुन करणारे सरकार असा शाब्दिक हल्ला देखील त्यांनी केला.
अन् राहुल गांधींसमोरच मांडला कुस्तीचा फड..! कोल्हापुरचे रांगडे गडी एकमेकांत लढले
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चुकीचा इतिहास दाखविणाऱ्या विरूद्ध आवाज उठवला. तर 354 सारखा खोटा गुन्हा सुद्धा या राज्यात दाखल होऊ शकतो. याचे उदाहरण आव्हाड साहेबांच्या निमित्ताने पाहायला मिळाले. खुन्नस किती असावी ? किती खालची पातळी गाठावी ? हे यानिमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं आहे. असं आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
Read also
- “72 तासाच 2 गुन्हे… आता आमदारीकाचाच राजीनामा देतो”; जितेंद्र आव्हाडांचा मोठा निर्णय
- “72 तासाच 2 गुन्हे… आता आमदारीकाचाच राजीनामा देतो”; जितेंद्र आव्हाडांचा मोठा निर्णय
- मोठी बातमी…! जितेंद्र आव्हाडांना अटक करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची बदली
- राज्य सरकारचे आणखी एक अपयश..! सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांवर टिकास्त्र
- राज्यात दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय..! बच्चू कडूंची 25 वर्षाच्या मागणीला यश