मुंबई : ज्या वरळीत सेनेच्या खासदार, आमदार, माजी मंत्री, माजी महापौर आणि नगरसेवक असे नेत्यांचे थरावर थर आहेत, तिथे म्हणे पक्षाला द्यायच्या 100 रूपयांच्या शपथपत्राला “बळ” अपुरे पडतेय… दुसरीकडे भाजपाची जांबोरी मैदानातील दहिहंडी मुंबईकरांच्या प्रचंड प्रतिसादाने लक्षवेधी ठरतेय. असं आशिष शेलारांनी म्हटलं आहे. त्यावर आता शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
“धनंजय मुंडेंची सगळी लफडी माहितीय, त्यामुळे त्याला आम्हाला गद्दार म्हणायचं अधिकार आहे का?”
भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड. आमचा गड म्हणून मिरवायचे. आता बघा कसे सगळे गडगडायला लागलेय भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत… लवकरच.. मुंबईकरच वरळीतून कोसळणाऱ्या थरांचा थरार निवडणूकीत “करुन दाखवतील” असा इशारा देखील आशिष शेलार यांनी दिला आहे.
“शिवसेना भवनासमोर शिवसेनेकडून निष्ठा दहीहंडीचे आयोजन”
आशिष शेलार काल म्हणत होते की वरळीतले आमदार आमच्या मतांनी निवडून आले आहेत. मग ते कुणाच्या मतांनी आमदार झाले? त्यांचे लोकसभेचे खासदार कुणाच्या मतांनी निवडून आले? ज्या मतदारसंंघातून ते निवडून येतात, तो त्याआधी कुणाचा बालेकिल्ला होता? आमच्या जिवावर मांडीला मांडी लावून तेही निवडून आले आहेत. आता वेळ बललली म्हणून भाषा बदलण्याचं काम काही लोक करत आहेत. असं सचिन अहिर यांनी म्हटलं आहे.
“अजित पवारांनी स्वत: च्या काकांसोबत गद्दारी केली, त्यावेळी नारेबाजी का केली नाही?”
वरळीतले थर पुर्णपणे मजबूत आहेत. शपथपत्राविषयी त्यांनी एक ट्विट केलं. एवढे कमी का? असं म्हटलं. पण त्यांनी याची काळजी करण्याची गरज नाही. वरळीतला शिवसैनिक निष्ठावान आहे. फक्त शपथपत्र लिहिण्यापुरता तो मर्यादित नाही. फक्त 3500 पदाधिकारी हे शपथपत्राच्या माध्यमातून आम्ही दिले आहेत. मतदारांपर्यंत आम्ही गेलोही नाही. असंही ते म्हणाले.
Read also
- “आता फक्त भाषणावर जीएसटी लावायची बाकी आहे” ; छगन भुजबळांचा केंद्रावर निशाणा
- “फडणवीसांचा ‘सागर बंगला’ हा वॉशिंग मशीनचं काम करत आहे”
- 50-50 चलो गुवाहटी..गद्दारांना ताट-वाटी..चलो गुवाहाटी; सलग दुसऱ्या दिवशीही विरोधकांची घोषणाबाजी
- “तुम्ही हजार कोटी घेतलेत, ते घेत असताना तुम्ही नामर्द होते का?” अन् बचू कडू संतापले
- “संजय राऊतांच्या संबंधित आणखी 3 ठिकाणी इडीचा छापा”; महत्त्वाची कागदपत्रे जप्त