मुंबई : एसटी आंदोलनाचा मुद्दा राज्यात अजूनही जोरदार तापलं जात आहे. कारण एसटी आंदोलनकांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या बंगल्यावर हल्ला केल्यानंतर तो अजून तापला गेला. भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शविला होता. आता याच पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. तसेच त्यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडीबाबत एक ट्विट केलं आहे.
सिल्व्हर ओकवरील हल्ला हा तर माझ्या आईवरच झालेला हल्ला- सुप्रिया सुळे
राज्याच्या हिवाळी अधिवेशात विधान परिषदेतील 10 सदस्यांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर त्यांना निरोप देण्यात आला होता. तसेच विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्ती पत्रावर राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जी विधान परिषदेसाठी पत्राद्वारे जी नावं पाठवली होती. ते पत्र बनावट असल्याचं राज भवनाकडून सांगण्यात आलं आहे. यावरून सदाभाऊ खोत यांनी आली रे आली पोलखोलीला घाबरून. मोहीम उधळून लावण्याची वेळ आली. असं म्हटलं आहे.
तुरूंगात जाणार पण रूबाबात! न्यायालयीन कोठडीत नेतांना सदावर्तेंनी उडवली काॅलर
शरद पवारांच्या बंगल्यावरील हल्ल्याचं आम्ही समर्थन करीत नाही. परंतु मवाळमध्ये शेतकरी पाणी मागायला आला त्यांनी तुम्ही गोळ्या घातल्या. ऊस आंदोलनात शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या. गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगड घातली. माझ्यावर ऊस आंदोलनात बावशी फाट्यावर राष्ट्रवादीच्या गुंडांनी हल्ला केला. आम्ही इतका मार खाल्ला तरी आकांततांडव कधी केला नाही. असा टोलाही त्यांनी लगावला.
मुंबई, सातारा, कोल्हापुर, बीड सदावर्तेंचा पुढचा मुक्काम ठरला! 14 दिवसांची पोलीस कोठडी वाढवली
दरम्यान, राज्यात जे काही आता सुरू आहे. ती फक्त स्टंडबाजी चालू आहे. पवारांची एसटी कामगार संघटना मोडीत निघाली आहे. त्यामुळेच गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना महाराष्ट्र दर्शन सुरू आहे. एसटी कामगार आपल्या दावणीला यावा म्हणून हे सगळं चाललं आहे. एकप्रकारे हे सरकार आणि पवार साहेब एसटी कामगारांना दहशतवादी असल्याप्रमाणे वागणूक देत आहेत. असंही त्यांनी सांगितलं आहे.
आली रे आली पोलखोलीला घाबरून.
.
मोहीम उधळून लावण्याची वेळ आली.
.#महाविकास_आघाडी_सरकार— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) April 19, 2022
Read also:
- मनसेने जाहीर केल्या 3 ठिकाण, 3 तारखा! मनसेची आगामी राजकीय रणनीती ठरतेय
- मवाळ, ऊस आंदोलनात शेतकऱ्यांना गोळ्या, पडळकरांवरील हल्ला, तरी आम्ही शांत अन्..; सदाभाऊ संतापले
- भाजपचं सरकार असताना मशिदीवरील भोंगे का उतरवले नाहीत? हिंदु परिषदेचा भाजपला सवाल
- “दंगलीचं काम भाजपने राज्यात दुसऱ्यांकडे सोपवलंय”; राऊतांचा राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
- राज ठाकरेंच्या सुरक्षाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! गृहमंत्र्यांनी केलं मोठं भाष्य