सांगली : उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील चौघे साधू कर्नाटकला देवदर्शनासाठी आले. त्यानंतर ते विजापुरवरून जत तालुक्यातल्या लवंगामार्गे पंढरपुरला जात असताना सांगलत त्यांना मारहाण कऱण्यात आली. मुलं चोरणारी टोळी समजून त्यांना जमावाने चांगलीच मारहाण केली. त्यावरून आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले आहेत. यातच भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी इशारा दिला आहे.
“राज्यात उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही?”; राज ठाकरेंनी शिंदे सरकारला फटकारलं
‘गर्व से कहो हं हिंदू है..’ अशी घोषणा ज्या दिवशी या सरकारने दिली त्याच दिवशी या राज्यात साधूंना मारहाण झाली. पालघर प्रकरणात महाविकास आघाडीला बदनाम करू पाहणारे आज कुठे आहेत? हा हल्ला निंदनीय आहे, यात कडक कारवाई व्हायलाच हवी. असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. तसेच या प्रकरणाबाबत गुन्हा देखील दाखल झाला आहे. तसेय या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात देखील घेतलं आहे. तसेच अजून 10 ते 15 जणांना अटक होणार आणि कठोर शिक्षा होईल, असंही आश्चार्य तुषार भोसले यांनी म्हटलं आहे. सांगलीमध्ये साधूसंतासोबत जी दुर्दैवी मारहाण झाली. त्याच बरोबरच जो काही अभद्र प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे.
संजय शिरसाठांना पुन्हा एकदा डावललं..! शिंदे गटाच्या नियुक्त्या जाहीर
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीत साधू संतांचा अपमान कधीही खपवून घेतला जाणार नाही. पालघर हत्याकांडात निर्दोष सांधूवर तत्कालीन फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारने अन्याय केला. त्यांचा प्रखर हिंदू विरोध देशाने पहिला आहे. मात्र वर्तमान सरकार हे साधू संतांचा सन्मान करणारे सरकार आहे. दोषींना कठोर शासन केले जाईल असं भाजप नेते राम कदम यांनी म्हटलं आहे.
“हे सरकार हार-तुरे अन् उत्सवांमध्ये व्यस्त, विरोधकही काही बोलत नाहीत”; राजू शेट्टी आक्रमक
दरम्यान, पंढरपुरकडे जाण्याचा रस्ता विचारले असता तरूणाला मुलं चोरणारी टोळी असल्याचा सांधूवर संशय आला. त्यानंतर त्या तरूणांनी ही सर्व माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर संपप्त ग्रामस्थांनी सांधूना गाडीतून बाहेर काढू बेदम मारहाण केली. त्यांना लाठी काठी आणि पट्ट्याने जबर मारहाण करण्यात आली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Read also
- बच्चू कडूंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी..! ना मंत्रिपद, ना पालकमंत्री पद आता थेट ?
- “लक्षात ठेवा…! राज्यात अस्सल हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे”; तुषार भोसले
- “माझी अक्कल काढली, तरी मला फारसं वाईट वाटत नाही”; पेडणेकरांना बावनकुळेंचं प्रत्युत्तर
- सेनेची जागा आता भाजप घेणार..! रिक्त झालेल्या जागेवर भाजपचा दावा, सेना-भाजपमध्ये रस्सीखेस
- शिंदेंच्या बंडखोरीनंतर मोठा राजकीय भुंकप..! माजी मुख्यमंत्र्यांसह काॅंग्रेसचे 8 आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश