हिंगोली : हिंगोलीतील कळमनुरीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आपल्या विविध वक्तव्यामुळे सातत्याने चर्चेत राहिले आहेत. यातच आता एका नव्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान झाले नाही तर भर चौकात फाशी घेऊन असं चॅलेंज संतोष बांगरांनी केलं आहे. त्यामुळे संतोष बांगरांच्या या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या जोरदार सुरू झाली आहे.
हेही वाचा…शिवसेना शिंदेंचीच, राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हिंगोलीत काल एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. तर त्याच सांयकाळी विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचा निकाल दिला. यामुळे संतोष बांगरांना बळ मिळालं असल्याची माहिती समोर आलीय. यातच २०२४ ची लोकसभा निवडणुक होत आहे. या निवडणुकीत पंतप्रधान म्हणून पुन्हा नरेंद्र मोदी होतील. असं झालं नाही तर भरचौकात फाशी घेणार असं मोठं विधान संतोष बांगर यांनी केलंय.
हेही वाचा…खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच..!देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
दरम्यान, कळमनुरी बाजार समिती निवडणुकीच्या वेळी देखील संतोष बांगरांनी अशाच पद्धतीने चॅलेंज दिलं होतं. या निवडणुकीत सत्ता आली नाही तर मिशी कापणार असे रोखठोक संतोष बांगरांनी जाहीर केलं होतं. परंतु यानिवडणुकीत महाविकास आघाडीचे १२ उमेदवार निवडून आले होते. यानिवडणुकीची चर्चाही राज्यभर करण्यात आली.
READ ALSO :
हेही वाचा…शरद मोहोळ खून प्रकरणात मोठी अपटेड, आरोपींना पिस्तूल पुरवणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हेही वाचा…रक्षा खडसेंचा पत्ता कट होणार, ‘या’ काॅंग्रेस नेत्याच्या मुलीचा भाजप प्रवेश ठरला ?
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजपचे ‘ते’ १६४ उमेदवार ठरणार, बारामती, नागपूरसह राज्यातील अर्धा डझन जागा
हेही वाचा…“जब बंदूक न हुई, तब तलवार होगी,”शिवसेना प्रकरणाच्या निकालावर ‘किरण मानें’ची खणखणीत पोस्ट
हेही वाचा…शिवसेनेच्या खटल्याचं क्रेडीट भाजपकडून फडणवीसांना , मग खरा पातळयंत्रणी कोण याचं उत्तर मिळतंय