मुंबई : शिवसेना पक्ष कोणाचा आणि आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले तर उद्धव ठाकरे गटाकडून कडाडून विरोध करण्यात आला. आता उद्धव ठाकरे गटने निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. यातच आता राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपवर याप्रकरणाच्या निकालावरून जोरदार टोलेबाजी केली आहे.
हेही वाचा…“खासदार हेमंत पाटलांचं बळ वाढलं,” मुख्यमंत्र्यांची आज हिंगोलीत जाहीर सभा
शिवसेना प्रकरणाबाबत राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदेंच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टिका केली. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतूक करत या प्रकरणाचं श्रेय त्यांना दिलं जातंय. यावरून खटला होता शिवसेनेतील दोन गटांचा. निर्णय दिला विधानसभा अध्यक्षांनी, अन् राणे, भातखळकर, कंबोज सारखी मंडळी याचं क्रेडीट देताय फडणवीसांना. म्हणजे जनतेला ज्याची साशंकता आहे, ते ही मंडळी उघडपणे कबूल करताय. पाताळयंत्रणी कोण याचं उत्तर तेच देताय. असा टोला प्रशांत जगताप यांनी लगावला आहे.
हेही वाचा…राहुल नार्वेकर कोणत्या गटाच्या आमदारांचा गेम करणार? वाचा संपुर्ण यादी
तर या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचे संपूर्णत: पालन करण्यात आले होते आणि त्यामुळेच हे सरकार मजबुत आणि भक्कम आहे, असे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आपल्या आदेशात हे सरकार बरखास्त करण्याचा कुठलाही आदेश देण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले होते. पण, काही लोक मुद्दाम आणि वारंवार सरकारबाबत गैरसमज पसरवून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते. आज विधानसभाध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला घेत, जो आदेश आज दिला, त्यानंतर आतातरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
खटला होता शिवसेनेतील दोन गटांचा… निर्णय दिला विधानसभा अध्यक्षांनी. राणे, भातखळकर, कंबोज सारखी मंडळी याचं क्रेडिट देताय फडणवीसांना.
म्हणजे जनतेला ज्याची साशंकता आहे, ते ही मंडळी उघडपणे कबूल करताय. पाताळयंत्री कोण याचं उत्तर तेच देताय.— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) January 10, 2024
READ ALSO :
हेही वाचा…शिवसेना शिंदेंचीच, राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा…खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच..!देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र निकाल, विधीमंडळात शिंदे अन् ठाकरे गटाचे कोण कोणते आमदार उपस्थित ?
हेही वाचा…निकालाची दुसरी बाजू, तर अजित पवार राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार? भाजपचा प्लॅन बी काय ?
हेही वाचा…निकाल आधीच ठरलाय..! राहुल नार्वेकरांची नार्को टेस्ट करा, ठाकरे गटाची आक्रमक भूमिका