मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्याचा परिणाम आता कुठेतरी जाणवू लागला आहे. आगामी निवडणुकांकरिता महाविकास आघाडीमध्ये घुसमट होण्याची शक्यता वर्तवली जात असताना शिंदेंनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेविरोधात बंड पुकारला. त्यांच्यासोबत सेनेचे 40 तर अपक्ष 10 असे एकुण 50 आमदारांनी बंड केला. त्यानंतर शिंदेंनी भाजपसोबत युती केली. मात्र आता शिंदे आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाले आहेत.
वसंत मोरेंचा दिलदारपणा..! स्मशानात मयत घेऊन जाताना आजोबा खडकावर पडले अन्…;
इडीची टांगती तलवार असल्याने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर सरनाईक यांना इडीकडून थोडासा दिलासा देखील मिळाला. यातच आता ओवळा-माजीवाडा मतदार संघ हा भाजपच्या माजी आमदाराला सोडावा, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. ओवळा-माजीवाडा हा मतदार संघ प्रताप सरनाईक यांचा असल्याने एकनाथ शिंदे आणि सरनाईक यांच्यात वाद निर्माण झाले आहेत.
विशेष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील प्रताप सरनाईक यांच्यावर दबाब टाकत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच हा मतदार फोडण्यासाठी प्रताप सरनाईक यांच्या निकटवर्तींना भाजपकडून आमीष देखील दाखवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांना जाब विचार असल्यास त्यांच्यात शाब्दिक चकमक देखील बघायला मिळाली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आतापासूनच फटाके फोडत असल्याने शिंदे गटात चिंतेचं वातावरण तयार झालं आहे.
“ज्यांनी शिक्षणाची दारी खुले केली, ते देखील आपले देव”; भुजबळांचं भाजपला प्रत्युत्तर
दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी प्रताप सरनाईक यांच्यावर इडीचा ससेमिरा पाठीमागे लागला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपकडून प्रताप सरनाईक यांच्यावर चौकशीची मागणी होत होती. त्यानंतर शिवसेना फुटीनंतर प्रताप सरनाईक यांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केल्याने त्यांना मध्यंतरी इडीकडून दिलासा मिळाला आहे. अशातच आता विधानसभा मतदार संघावरून आता जोरदार वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Read also
- राष्ट्रवादीचा बारामतीतील ओबीसींचा “हा” आक्रमक चेहरा भाजपने फोडला
- गणेशोत्सव अन् नवरात्र उत्सवांप्रमाणे ‘स्वच्छता’ हा देखील एक उत्सव व्हावा ; चंद्रकात पाटील
- “एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ”; शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज
- “हे हिंदुत्वाचे सरकार आहे, इथे भक्तांचाच आवाज ऐकला जाईल;” तुषार भोसले
- “एकनाथ शिंदेंच्या सभा म्हणजे बाळसाहेबांच्या सभा आहेत की काय असा भास होतो”; उदय सामंत