मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या गोरेगाव पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी इडीच्या ताब्यात आहेत. त्यांची पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली असून त्यांचा मुक्काम हा 4 ऑक्टोबर पर्यंत तरी तुरूंगात राहणार आहे. यातच या प्रकरणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची चौकशी व्हावी, अशी मागणी आता भाजपने केली आहे.
“हिमंत असेल तर शिंदे गटातील आमदारांना भाजपानं पक्षात विलीन करावं”; भास्करराव जाधव
भाजपचे नेते अतुल भातखळ आणि किरीट सोमय्यांनी याप्रकरणी शरद पवारांच्या चौकशीची मागणी केली आहे. त्याबाबत किरीट सोमय्या म्हणाले की, खरं म्हणजे इडीने कधी आरोप केलाच नाही. शरद पवार विषय दुसरीकडे फिरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना संजय राऊतांबद्दल सहानुभूती दिसतेय. आहो, चार्टशीट संजय राऊतांवर आहे, त्यामुळे शरद पवारांमध्ये हिमंत असेल तर सांगावं ना की, संजय राऊत निर्दोष आहेत. शरद पवारांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी सांगावे की, त्यांचे कौटुंबिक स्नेही असणारे वाधवान कुटुंबीय निर्दोष आहेत. असं किरीट सोमय्यांनी म्हटलंय.
“आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल, आदर देतोय, आदर घ्या…;” मनसेचा शरद पवारांवर निशाणा
पुढे बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, शरद पवारांमध्ये अजूनही हिमंत शिल्लक असेल तर त्यांनी प्रवीण राऊत, संजय राऊतांनी घेतलेली संपत्ती आणि कमावलेला पैसा निर्दोष आहे असं सांगावं. त्याचबरोबर अनिल परब यांच्यासंदर्भातील दापोलीतील रिसॉर्टवर दसऱ्यापासून कारवाई कऱण्यात येईल, असा इशाराही सोमय्यांनी दिला आहे.
“तेव्हा दोन तास मला गुंतवणुकदारांसाठी काढायला लागायचे पण आता…”; शरद पवार
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून गोरेगाव पत्राचाळ प्रकरण राज्यात चांगलाच गाजत आहे. याप्रकरणी अनेकांची नावं समोर येत असून संजय राऊतांनी दोन महिन्यापूर्वीच इडीने अटक केली आहे. इडीने सादर केलेल्या आरोपपत्रात पत्राचाळ प्रकरणातील गैरव्यवहार केलेले पैसे संजय राऊतांनी ठाकरे चित्रपटात गुंतवले असल्याचं देखील त्यात नमुद करण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढं नेमकं काय घडतं. ? त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
Read also
- “एकाने देश विकला, एक महाराष्ट्र विकतोय”
- “माझे काम भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी संपवण्याचे आहे”; राहुल गांधी
- उद्धव ठाकरेंंची दिवसेंदिवस ताकद वाढतेय; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी सेनेत केला प्रवेश
- “माझे कुटुंब, माझी जबाबदारी, आम्ही फक्त चार राहू बाकी कोणीच नाही”; चंद्रशेखर बावनकुळे
- “उद्धव ठाकरेंनी कालचं भाषण दारू पिऊन केलंय”; अन् नारायण राणेंची जीभ घसरली