मुंबई : फॉक्सकॉन प्रकल्प जर महाराष्ट्रात झाला असता तर मला निश्चित आनंद झाला असता. त्यासाठी जागाही ठरली होती. नव्या पिढीला काम करण्याची अधिक संधी मिळाली असती. त्यामुळे तो प्रकल्प इथे होणे गरजेचे होते. आता तो प्रकल्प गुजरातला गेला तरी शेवटी या देशात तो कुठेतरी होतो ही गोष्ट मला मान्य आहे. असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
“निवडणुक आली की गिधाडांना मुंबई दिसते, हिंमत असेल तर, घ्या निवडणुक”; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
त्यामुळे केवळ विरोधासाठी विरोधी भूमिका घेणार नाही. खरं तर राज्य सरकारने एक गुंतवणुकीचे वातावरण केले पाहिजे. राज्यात काम करत होतो तेव्हा दोन तास मला गुंतवणुकदारांसाठी काढायला लागायचे. त्याचे कारण गुंतवणुकीचे वातावरण हे महाराष्ट्रात चांगले होते. आज त्याला धक्का बसला असेल. इथे राजकीय भूमिका न घेता सगळ्यांनी राज्याच्या हितासाठी गुंतवणुकीचे वातावरण तयार करायला हातभार लावावा. अशा प्रश्नावर आमची भूमिका ही सकारात्मक आहे. आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये फ्रंटपेजवर एकंदरीत एनडीएच्या कालखंडामध्ये काही ठरावीक काळात किती जणांवर केस केल्या आहेत, कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्यांवर केस केल्या आहेत, यासंबंधीचे वृत्त आहे. असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
“शिवसेना फुटल्याचं दु:ख आहे , तुम्हाला राष्ट्रवादी जवळची की पन्नास आमदार?” रामदास कदम
देशात समाजाचे प्रश्न बाजूला ठेवून उद्याच्या निवडणुकीनंतरच्या अपेक्षांबद्दलची आशंका मनात असेल तर ती दूर करण्यासाठी अन्य पक्षाच्या लोकांवर खटले भरणे, चौकशी करणे, अटक करणे या गोष्टी महत्त्वाचा कार्यक्रम म्हणून हाती घेतल्या जात आहेत. परंतु त्याला राजकीयदृष्ट्या आम्ही तोंड देणार. राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. अपेक्षा आहे की राज्याचा प्रमुख ज्यावेळी काही बोलतो त्यावर लोकांच्या अपेक्षा असतात. लोकांना संकटातून मुक्त करण्यासाठी धोरण जाहीर केलं आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी करावी. असंही त्यांनी सांगितलं आहे.
Read also
- “ठाकरेंना गिधाड अन् गरूडामधलं फरक माहित नाही, अमित शहा हे गरूड आहेत”; भाजपचं प्रत्युत्तर
- शिवतीर्थावरील परवानगी ठाकरेंना नाकारली, अंधारे म्हणाल्या, “काल फक्त ट्रेलर होता, एवढ्यात घाबरलात ?”
- “उरलेला तुमचा करेक्ट कार्यक्रम महापालिका निवडणुकीत करू”; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
- “महापालिकेच्या सत्तेत असंख्य यशवंत, कीर्तिवंत भ्रष्टाचाराचे राक्षस उभे केलेत”; मनसेची टिका
- “हल्ली बाप पळवणारी औलाद महाराष्ट्रात फिरतेय”; उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर निशाणा