नवी दिल्ली : संसदेत गोंधळ घातल्याप्रकरणी विरोधी पक्षातील तब्बल १४३ खासदारांचं निलंबण करण्यात आलं आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या विरोधात आता विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज इंडिया आघाडीकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. तर सरकारला अराजकता माजवणारे तीन कायदे पारित करायचे आहेत म्हणून त्यांनी विरोधकांना सभागृहाच्या बाहेर काढल्याचा आरोप शरद पवार गटाच्या खासदार वंदना चव्हाण यांनी केला आहे.
हेही वाचा…सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रं देण्याचा वेग वाढवला, आतापर्यंत ‘इतके’ प्रमाणपत्राचं वाटप
संसदभवन परिसरातून सरकार विरोधात खासदार निलंबनाबाबत आंदोलनातून खासदार वंदना चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, संसदेत झालेल्या घटनेनंतर दोन्ही सभागृहात येऊन सरकारने भाष्य करणे गरजेचे होते, पण ते त्यांनी केलं नाही. आम्ही खासदार असून शासनाचे निर्णय हे पेपरमधून वाचत आहोत. लोकशाहीमध्ये असे चालत नाही, यात ट्रान्सफरन्सी आणि अकाऊंटबिलीटी लागते ही पुर्णपणे या सरकारने धाब्यावर ठेवलेली असल्याची टिका वंदना चव्हाण यांनी मोदी सरकारवर केली आहे.
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ युवा नेत्याने केली आत्महत्या ; आत्महत्या की घातपात संशय ? पुण्यात एकच खळबळ
दरम्यान, संसदेत झालेल्या घटनेवर होम मिनिस्टर आणि प्राईम मिनिस्टर यांनी स्टेटमेंट देणे गरजेचे होते, पण ते त्यांनी दिले नाही.आणि ते देण्याची त्यांची इच्छाही दिसत नाही आणि उलट ही मागणी आम्ही केली तर, आमचे निलंबन होते ही शोकांतिका आहे. आत्ता नव्याने आलेले तीन कायदे हे अराजकता माजवणारे कायदे आहेत, त्यांना ते पारित करायचे आहेत आणि म्हणून त्यांनी विरोधी पक्षांना बाहेर ठेवता येईल तेवढा प्रयत्न केलेला आहे. या देशाची क्रिमिनल लॉ सिस्टीम संपूर्णपणे उध्वस्त करण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न आहे आणि जर शासन या पद्धतीचं काम करत असेल, तर लोकतंत्र हे नक्कीच संपुष्टात येईल. अशी शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सावलीसारखे कार्यकर्ते सोडून गेलेत हे कळलं नाही, पण..,”अजित पवार गटाचा आव्हाडांना खोचक टोला
हेही वाचा…“मुंबईतील सर्वाधिक टेंडरबाजी करणारे आज मुख्यमंत्र्यांच्या..,” राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा…“हिवाळी अधिवेशनात १७ पैकी १२ विधेयके मंजूर ; मराठा आरक्षणावर तब्बल ३ दिवस चर्चा,” मुख्यमंत्र्यांची माहिती
हेही वाचा…“हिवाळी अधिवेशनात १७ पैकी १२ मंजूर विधेयके मंजूर ; मराठा आरक्षणावर तब्बल ३ दिवस चर्चा,” मुख्यमंत्र्यांची माहिती
हेही वाचा…भाजपचं ठरलंय..! शिंदे आणि अजित पवार कमळावर निवडणुका लढवणार; माजी मंत्र्यांचा मोठा दावा