नागपूर : नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपुरमध्ये भाजप-आरएसएस यांची एक वैचारीक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले. ज्यांच्यावर आरोप आहेत. ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना सोबत घेऊ नये, असे ठरविण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
हेही वाचा…“बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना असे म्हणायचे, आता उबाठावाले कुत्तासोबत नाचतात,” शिंदे गटाचा हल्लाबोल
जितेंद्र आव्हाड यांनी पुढे असंही म्हटलं की, ज्यांना राजकारण समजते, ज्यांना राजकीय जाण आहे. त्यांना लगेच समजले असेल की, महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणुक लढवायची आहे. त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी, महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही. अशी शक्यता देखील जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यावर आता शिंदे आणि अजित पवार गट काय प्रत्युत्तर देणार? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…निवडणुकीआधी इंडिया आघाडीत बिघाडी; जागावाटपावरून काॅंग्रेस, तृणमूल काॅंग्रेस आणि आप आमनेसामने
दरम्यान, महायुतीतील काही खासदारांनी भाजपच्या कमळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. असा दावा देखील जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यावरून शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. यातच लोकसभा नाही परंतु विधानसभा निवडणुका ह्या भाजपच्याच तिकीटावर लढवल्या जातील आणि भाजप स्वबळावर लढवणार. तसेच ज्यांना यायचं त्यांनी यावं, नाही तर त्यांना बाहेर काढलं जाईल. असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.
नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
नागपूरमध्ये भाजप -आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे…— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 20, 2023
READ ALSO :
हेही वाचा…सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रं देण्याचा वेग वाढवला, आतापर्यंत ‘इतके’ प्रमाणपत्राचं वाटप
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ युवा नेत्याने केली आत्महत्या ; आत्महत्या की घातपात संशय ? पुण्यात एकच खळबळ
हेही वाचा…“आम्ही अदाणीला घाबरत नाही, भविष्यातही रस्त्यावर उतरून संघर्ष करू”, वर्षा गायकवाड कडाडल्या
हेही वाचा…“आदित्य राजाच्या कृपने वरूण राजानं अक्षर:श टेंडरचा पाऊस पाडला” ; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
हेही वाचा…“मराठा आंदोलनादरम्यान शासनाने किती गुन्हे मागे घेतले?” फडणवीसांना सांगितला आकडा