नागपूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळातील भ्रष्टाचाराचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाडा वाचला. तर आदित्य राजाच्या कृपने वरूण राजानं अक्षर:श टेंडरचा पाऊस पाडला. असा हल्लाबोलही त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर चढवला. हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्ताव यावेळी एकनाथ शिंदे यांनी वाचला. त्यावरून त्यांनी उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
हेही वाचा…“शारीरिक हव्यासापोटी ३८ वर्षीय नराधमाचा ६४ वर्षीय महिलेवर ब’ला’त्का’र”, चित्रा वाघ महिलेसाठी रूग्णालयात धावल्या
कोविड काळातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील एक महत्वाचं प्यादं हा रोमिन छेडा आहे. या कंपनीच्या सुरस कथांची जिजामाता उद्यानातील पेंग्विनपासून झाली. हायवे बनवणाऱ्या या कंपनीला पेंग्विनसाठीचं बांधकाम करण्याचं कंत्राट दिलं. रोमिन छेडाला तब्बल ५७ कंत्राटं देण्यात आली. रोमिनला पेंग्विनपाठोपाठ कोविडच्या कठीण काळात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कंत्राट देण्यात आलं. कोण आहे हा ? कशासाठी दिलं ? गमंत म्हणजे त्याचं बोरिवलीत परिहार डिपार्डमेंटल स्टोअर नावाचं कपड्यांचं दुकान होतं. कंत्राट मिळताच दोन टक्के पैसे ठेऊन बाकीचे सगळे पैसे रोमिन छेडाच्या खात्यात वळवण्यात आले. पैशांच्या खेळांसाठी मुंबईकरांच्या जीवाशी किती खेळ करायचा ? असा सवाल देखील शिंदेंनी केला.
हेही वाचा…“शिंदेंना मराठा समाजाला आरक्षणच द्यायचं नाही”, माजी मुख्यमंत्र्यांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप
अंतिम आठवडा प्रस्ताव वाचला. त्यात प्रकर्षाने काही गोष्टी जाणवल्या. विरोधी पक्ष अतिशय गोंधळलेल्या अवस्थेत आहे. पहिल्या दिवशीही मी ते म्हणालो होतो. ओ जयंतराव.. बसा ना.. मजा नाही येणार. कदाचित महाविकास आघाडीचे सगळे वरीष्ठ नेते दिल्लीत जागावाटपाच्या कामात व्यग्र असल्यामुळे त्यांना योग्य दिशा मिळाली नसेल. शिवाय दिशा प्रकरणात काही सदस्यांनी मतं मांडल्यामुळे आधीच दिशाहीन झालेल्या विरोधी पक्षाचं गलबत आणखीनच भरकटलेलं दिसलं. अंतिम आठवडा प्रस्तावात काय मागणी केली पाहिजे, याचा विचार विरोधी पक्षांनी केला पाहिजे. असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
हेही वाचा…“देवाच्या देवळात कोट्यावधीचा भ्रष्टाचार,” शनिशिंगणापूर संस्थानचं ऑडिट होणार, शिंदे-फडणवीसांची मोठी घोषणा
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, मागच्या सरकारच्या काळात मी उपसमितीचा अध्यक्ष होऊ नये म्हणूनही पडद्याआडून प्रयत्न झाले. मी मराठा समाजासाठी काम करेन ही भीती तेव्हा अडीच वर्षांच्या मुख्यमंत्र्यांना आणि अशोक चव्हाणांना होती. मी तेव्हाही म्हटलं अशोक चव्हाण मुख्यमंत्री होतायत, तर होऊ द्या. जे काही साटंलोटं केलं, डावललं हा विषय झालंगेलं गंगेला मिळालं. विरोधी पक्षांचे मगरमछ के आँसू आहेत. अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये विदर्भाचा मुद्दा मांडण्याची त्यांना संधी होती. पण ती त्यांना साधता आली नाही. यावरून विरोधकांचं विदर्भावरचं बेगडी प्रेम दिसून येत आहे. सरकारने विदर्भासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“मराठा आंदोलनादरम्यान शासनाने किती गुन्हे मागे घेतले?” फडणवीसांना सांगितला आकडा
हेही वाचा…“बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना असे म्हणायचे, आता उबाठावाले कुत्तासोबत नाचतात,” शिंदे गटाचा हल्लाबोल
हेही वाचा…निवडणुकीआधी इंडिया आघाडीत बिघाडी; जागावाटपावरून काॅंग्रेस, तृणमूल काॅंग्रेस आणि आप आमनेसामने
हेही वाचा…“शाळा बंद झाल्या आणि बिअरचा खप १२ टक्क्यांनी वाढला”
हेही वाचा…मराठा आरक्षण लांबणीवर, रात्री एकनाथ शिंदेंचा फोन, मनोज जरांगे पाटील म्हणाले..