नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी चांगलीच कंबर कसली आहे. यातच काल इंडिया आघाडीची नवी दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीपुर्वीच इंडिया आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तृणमूल काॅंग्रेस, काॅंग्रेस आणि आपमुळे इंडिया आघाडीचं गणित बदल जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“बाळासाहेबांना विचारलं तर कमरेत लाथ बसेल”, भरत गोगावलेंचं वादग्रस्त विधान, दानवेंनी घेतला समाचार
काल इंडिया आघाडी बैठक झाल्यानंतर राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यात एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काॅंग्रेस म्हणजे ममता बॅनर्जी या काॅंग्रेसला फक्त दोनच जागा सोडायला तयार आहेत. तर दुसरीकडे मिझोरम, मेघालय तसेच इशान्यकडील राज्यांमध्ये देखील तृणमूल काॅंग्रेस जागा मागत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आम्ही तृणमूल काॅंग्रेसला पराभूत करण्यासाठी काॅंग्रेससोबत जाऊ असं सिताराम येचूरी सांगत आहेत.
हेही वाचा…भाजपच्या एका खासदाराला वाचवण्यासाठी १४१ खासदार निलंबित”
दरम्यान, त्यामुळे तृणमूल काॅंग्रेस आणि काॅंग्रेसमध्ये पश्चिमबंगालमध्ये पुन्हा वाद झाला आहे. तर पंजाबमध्ये लोकसभेच्या एकूण ११ जागा असून त्या सर्व आम आदमी पार्टीला सोडायला काॅंग्रेस तयार नाही. काल आम आदमी सोबत बैठक झाली तेव्हा पंजाबमधील काॅंग्रेसचं युनिट ११ जागा सोडायला तयार नाहीत. तर आम्ही सर्व स्वबळावर जागा लढवू असा दावा आम आदमी पार्टीने केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधी इंडिया आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शाळा बंद झाल्या आणि बिअरचा खप १२ टक्क्यांनी वाढला”
हेही वाचा…मराठा आरक्षण लांबणीवर, रात्री एकनाथ शिंदेंचा फोन, मनोज जरांगे पाटील म्हणाले..
हेही वाचा…“शारीरिक हव्यासापोटी ३८ वर्षीय नराधमाचा ६४ वर्षीय महिलेवर ब’ला’त्का’र”, चित्रा वाघ महिलेसाठी रूग्णालयात धावल्या
हेही वाचा…“शिंदेंना मराठा समाजाला आरक्षणच द्यायचं नाही”, माजी मुख्यमंत्र्यांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप
हेही वाचा…“देवाच्या देवळात कोट्यावधीचा भ्रष्टाचार,” शनिशिंगणापूर संस्थानचं ऑडिट होणार, शिंदे-फडणवीसांची मोठी घोषणा