दिल्ली : सध्या, राज्यातील महत्वाच्या नेत्यांच्या दिल्लीत भेटीगाठी वाढल्या असून, दिल्लीतल्या राजकीय खलबतं आणि डावपेचांमुळे, राज्यातील राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. सर्व प्रथम काल फडणवीसांनी दिल्लीवारी करत अमित शहांची भेट घेतली, यांनतर आज शरद पवारांनी राजनाथ सिंग, पियुष गोयल आणि पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे.
अबब! अनिल देशमुखांच्या जप्त केलेल्या मालमत्तेची खरी किंमत वाचून डोळे पांढरे होतील…
दरम्यान, या सगळ्या घटना ताज्या असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर दोघेही उपराष्ट्रपतींच्या बैठकीसाठी एकाच गाडीतून रवाना झाल्याने, यावेळी त्यांच्यात काय चर्चा झाली असेल, याचा अंदाज आता माध्यमांनी बांधणे सुरु केले आहे.
चर्चा फक्त फडणवीस-पवारांच्या भेटीगाठींची, राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याच्या तर्कवितर्कांना उधाण
संसदेचं पावसाळी अधिवेशन १९ जुलैला सुरु होणार आहे ते १३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत उपराष्ट्रपतींनी बैठक आयोजित केली होती. दरम्यान, मागील २ दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीत आहेत. यावेळी पीयूष गोयल यांनी स्वतः शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ही एक सदिच्छा भेट होती. पियुष गोयल यांची, राज्यसभेतील सभागृह नेतेपदी नियुक्ती झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सहकार्याबाबत आणि शिष्टाचाराचा भाग म्हणून त्यांनी ही भेट घेतल्याची माहिती नवाब मलीक यांनी दिली.
शिरुरचे आजी-माजी खासदार आमने-सामने; रस्ता उद्घाटनाचे श्रेय लाटण्यासाठी आक्रमक!
यांनतर, देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या कार्यालयात एक बैठक झाली. या बैठकीला त्यांनी उपस्थिती दर्शवली. या बैठकीला पवार यांच्यासोबत माजी संरक्षणमंत्री काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए. के. अँटोनी, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत आणि भूदल प्रमुख जनरल मनोज नरवणे उपस्थित होते.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे-भाजप युती? फडणवीसांचे सूचक विधान
यावेळी, “सीमेवर ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याबाबत सरकारकडून माहिती दिली गेली. याचबरोबर अशी परिस्थिती हातळण्यासंदर्भात काही महत्वपूर्ण चर्चा देखील झाली. पवार हे माजी संरक्षणमंत्री असल्याने त्यांच्याशी बोलणे महत्वाचे होते. त्यांना लडाखमधील चीनच्या हालचाली आणि भारताची स्थिती याबद्दल माहिती दिली गेली,” असं मलिक यांनी सांगितलं
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला पुन्हा गर्दी; पक्षाची मोर्चेबांधणी सर्वसामान्यांच्या मुळावर उठलीये का?
यांनतर त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या भेटीबद्दल माहिती देण्यासाठी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी….
- या भेटीत चर्चिल्या जाणाऱ्या मुद्द्यांवर आधी फोनवर चर्चा केली होती. मात्र, प्रत्यक्ष बसून चर्चा होण्याची अपेक्षा होती. आज ती भेट झाली. त्यामुळे, ही भेट पूर्वनियोजित होती.
- सहकारी बँक अधिनियम बदलण्यात येत आहेत, त्यावर चर्चा झाली.
- आरबीआयला एवढे अधिकार कसे? नव्या नियमानुसार कोणीही शेअर होल्डर शेअर विक्री करू शकतात. या नियमामुळे अनेक मोठे उद्योजक यात येतील आणि सहकार मोडीत निघेल. या बैठकीत ही लेखी मागणीही होती. रिझर्व्ह बँकेला जास्त अधिकार देण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या सहकार क्षेत्रातील नियमांमुळे, स्वायत्ततेचा अधिकार धोक्यात आला आहे, याबद्दलच ही भेट होती.
- महामारीवर मात करण्यासाठी राष्ट्रीय धोरण बनवावे, याविषयी देखील बैठकीत चर्चा झाली.
- लसीकरण प्रक्रियेतल्या असमतोलावरही पवार यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली.
- पंतप्रधान मोदी-शरद पवार भेट होणार असल्याचं काँग्रेस नेत्यांना माहिती होतं.
असे सांगितले आहे. तसेच, “भाजप-राष्ट्रवादी काॅंग्रेस हे एकाच नदीचे दोन किनारे आहेत. ते एकमेकांना कधीच भेटू शकत नाहीत. भाजपचा राष्ट्रवाद आणि आमचा राष्ट्रवाद यात फरक आहे. भाजपशी राजकीय सख्य असण्याचे कारण नाही, मात्र राजकारणात वैयक्तिक मैत्री असू शकते, याचा अर्थ एकत्र येणार असा नसतो,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Read Also :
- कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल, “हे’ आहे खरे कारण
- एमएच १२ चे बडे नेते राष्ट्रवादीत; २०२२ ला महापालिका निवडणुकीत घड्याळ भाजपचे १२ वाजवणार?
- मोदींच्या सभेत काळे मास्क खेचून काढले, कलियुग म्हणतात ते हेच का?
- ‘मिस्टर इंडिया’ झालेल्या झोटिंग समितीच्या अहवालावर, अजित पवारांचा मोठा खुलासा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात दिल्लीत खलबतं; राजकीय भूकंप होण्याची शक्यता?