शिरूर : कर्जत येथील मेळाव्यात शिरूरची जागा आपणच जिंकणार अन् त्याच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात येत कामांचा आढावा घेतल्याने शिरूर लोकसभेची चर्चा सर्वदूर सुरू झाली. त्यानंतर अमोल कोल्हेंनी देखील अजित पवारांचं आवाहन स्विकारत साहेबांनी पुन्हा संधी दिल्यास निवडणुकीला सामोरे जाणार असं म्हणत ही निवडणूक अटातटीची करून टाकली आहे. यातच आता मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या होम पिचवर शरद पवारांची सभा होत असल्याने खासदार अमोल कोल्हे यांना बळ मिळाल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा…गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाड यांना १४ तारखेपर्यंत कोठडी, कोर्टात जोरदार युक्तिवाद
शिरूरची जागा कोणत्याही परिस्थितीत आपण जिंकणारच असं म्हणत कर्जत येथील मेळाव्यानंतर अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. परंतु दुसऱ्या बाजूला शरद पवार देखील विद्यामान खासदार अमोल कोल्हे यांना मोठी ताकद देत आहेत आणि त्यासाठीच शरद पवारांची शिरूर लोकसभा मतदारसंघात २१ फेब्रुवारीला तिसरी सभा सहकारमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या होमपिचर होत आहे.
हेही वाचा…राज्यसभा निवडणुक..! “सहाव्या जागेसाठी सगळ्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा विचार करायला हवा”
दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या अशोक पवार हेच आमदार शरद पवार गटात आहेत. शिरूर तसेच आंबेगाव मतदारसंघात पक्षाची बांधणी करण्यासाठी तसेच अमोल कोल्हे यांना बळ देण्यासाठी शरद पवार गटाने मोठी रणनिती आखली आहे. ठरलं. तोफ धडाडणार, मी येतोय… अशी टॅंगलाईन देऊन शिरूर-आंबेगाव मतदारसंघात येत असल्याचा संदेश शरद पवार गटाकडून अजित पवार गटाला देण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“जरांगे पाटलांसह ओबीसी समाजीची मोठी दिशाभूल, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची भूमिका संशयास्पद ?”
हेही वाचा..तर सुनील तटकरेंचा रायगड लोकसभा मतदारसंघात गेम होणार ? ठाकरेंच्या सभांमुळे तटकरेंना फुटला घाम
हेही वाचा…“तिसऱ्यांदा उमेदवारी मागण्यासाठी बारणेंनी पहिला कामाचा अहवाल द्यावा”, मावळात लोकसभा उमेदवारीवरून महायुतीत मोठी धुसफूस
हेही वाचा..“तर पेट्रोलच्या टाकीवर पाण्याची टाकी लिहून ते आगीवर ओतायला लावतील”,अजित पवार गटाने आव्हाडांना डिवचलं
हेही वाचा….“गुन्हेगारांचा बाप सागर बंगल्यावर बसला आहे का ?” विरोधकांचा राज्य सरकारला सवाल