मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्यासाठी शेवटचे काही मिनिटे शिल्लक राहिले आहे. यातच आता राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. आज दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणुक आयोगाची पत्रकार परिषदेही होत आहे. यावेळी निवडणुक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. लोकसभा निवडणुकीची घोषणा होताक्षणी देशभरात आचारसंहिता लागणार आहे. त्यानंतर निवडणुक संपेपर्यंत सरकारला कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. त्यामुळे लोकसभेची आचारसंहिता लागू होण्यापुर्वी राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे.
हेही वाचा…महायुतीतच तणावाचे १० लोकसभा मतदारसंघ ; जागावाटपाचा फॉर्म्युला अडला, दिल्लीत होणार अंतिम निर्णय
लोकसभेसाठी आचारसंहिता लागू करण्यापुर्वी राज्य सरकारने मोठे निर्णय घेतले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या दोन बैठकांमध्ये ४५ महत्वाचे निर्णय घेला असून शनिवारी झालेल्या बैठकीत आणखी १७ महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने अवघ्या आठवडाभरता ६२ महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
हेही वाचा…संभाजीनगरमध्ये खैरे-दानवे संघर्ष पेटणार ; लोकसभा उमेदवारीवरून अंबादास दानवे नाराज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय
राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी
तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार
मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला
१३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.
संस्कृत, तेलुगू, बंगाली, गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापणार
शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण
विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ.
हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली ‘मॅनहोलकडून मशीनहोल’ कडे योजना
संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार
राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार
ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ. ५० कोटी अनुदान
भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप
संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार
वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन
राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी २० कोटी अतिरिक्त निधी मंजूर
श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण, भूमिपूजन झालेल्या सिडकोच्या विकास प्रकल्पांचा जनतेला असा होणार फायदा –
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुलामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाकडे जाण्याकरिता व तेथून येण्याकरिता थेट प्रवेश मार्ग उपलब्ध होणार आहे. शिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासदेखील थेट जोडणी मिळणार आहे.
खारघर-तुर्भे जोड मार्ग हा ५.४ कि.मी. लांबीचा मार्ग असून या मार्गाद्वारे तुर्भे आणि खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे.
उलवे येथील भूमिपुत्र भवन हे नवी मुंबईतील स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून विकसित करण्यात आले आहे. या भवनाच्या माध्यमातून स्थानिकांना त्यांचे विविध सोहळे व कार्यक्रम साजरे करण्यासाठी हक्काची जागा प्राप्त होणार आहे.
उलवे किनारी मार्ग हा अटल सेतू (एमटीएचएल) आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा सहा पदरी मार्ग विकसित करण्यात येत आहे.
नेरूळ येथे प्रवासी जलवाहतूक टर्मिनस विकसित करण्यात आले असून येथून नवी मुंबई ते दक्षिण मुंबई आणि कोकण या दरम्यान रो-रो आणि स्पीड बोट सेवा लवकरच सुरू होणार आहे.
नेरूळ, नवी मुंबई येथून मुंबई (भाऊचा धक्का) Domestic Cruise Terminus (DCT) तसेच एलिफंटा गुंफा, मांडवा, रेवस इत्यादी ठिकाणी जलवाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे या प्रदेशांदरम्यान प्रवासाचे अंतर लक्षणीयरित्या कमी होणार आहे. तसेच पर्यटकांनाही या ठिकाणाला भेट देऊन रम्य सागरी प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे.
READ ALSO :
हेही वाचाबीडमध्ये शरद पवार धक्कातंत्राचा वापर करणार ; तगडा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात
हेही वाचा…“खैरेंसाठी नाही तर ठाकरेंसाठी काम करतोय, दानवेंनी सगळंच सांगितलं,”
हेही वाचाराज्यात आणखी काका-पुण्याचा संघर्ष, “महादेव जानकरांविरोधात पुतण्यानेच दंड थोपडले”
हेही वाचा….“भाजपच्या मिशन ४५ ला मराठा समाज सुरूंग लावणार,” जरांगे पाटलांनी फडणवीसांना दिला ‘हा’ इशारा
हेही वाचा..साताऱ्यातून उदयनराजेंचा पत्ता कट होणार का ? चर्चांना उधाण, तर कार्यकर्ते आक्रमक