मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यात सुरूवात केली आहे. यातच काल शिवसेनेचा वर्धापन दिवस दोन्ही गटाने साजरा केला. तर आज मुंबई महानगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. यातच आता १ जुलै रोजी मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व आदित्य ठाकरे करणार आहे. अशी माहिती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणायची हिमंत आमच्यात, पोलिसांमध्ये हिंमत असेल तर आम्हाला जेलमध्ये टाकावं”, सुप्रिया सुळे
दरोडे टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही. गेल्या १५-२० वर्ष मुंबई महापालिकेवर दरोडा टाकला. मुंबई महापालिकेचे हजारो कोटी कुठे गेले, याचा हिशोब आता कॅग विचारणार आहे. एसआयटीची स्थापना झाल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. दिशाभुल करण्याचा प्रयत्न आहे. दुध का दुध पानी का पानी होईल. उलटा चोर कोतवाल को दांडे असा प्रकार आहे. कॅगच्या ताशोऱ्यांवर एसआयटी लावली आहे, ती निष्पक्षपणे काम करेल, मुंबईकरांचा मुंबईकरांच्याच तिजोरित राहायला हवा. तो कोणालाही वळवता येणार नाही. ही केवलवाणी धडपड आहे. असंही शिंदे म्हणाले.
हेही वाचा…“जयंत पाटील लवकरच राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश करणार”, राज्यातील बड्या नेत्याचं सुचक विधान
दरम्यान, गद्दार शेवटी गद्दारच राहणार आहे. असंतोषाला वाचा फोडायला काही कृती करू नका. कारण लोकांच्या मनात असंतोष धुमसतोय आणि याने किती काही म्हटलं तर यांच्या कपाळावरील गद्दार हा शिक्का कधी पुसला जाणार नाही. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती निशाणा साधला आहे. मुंबई महापालिका एकेकाळी साडेसहाशे कोटीत होती. शिवसेनेकडे कार्यभार आल्यानंतर ही ठेवी जवळपास 92 हजार कोटीपर्यंत पोहोचली. या ठेवींमधून कोस्टल रोड, जनतेच्या उपयोगाची कामं महापालिका पार पाडत होती. अशी टिका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“गुलाबराव पाटलांना ५०० रुपयांचा दंड, एकनाथ खडसेंवर केलेले ते आरोप पाटलांना भोवले”
हेही वाचा…ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीत ५ ते ६ माजी नगरसेवक गैरहजर, चर्चांना उधाण
हेही वाचा…ठाकरे गटाचा मनपावर 1 जुलै ला विराट मोर्चा, आदित्य ठाकरे नेतृत्व करणार
हेही वाचा…“ठाकरे गटाचा मनपावर 1 जुलै ला विराट मोर्चा, आदित्य ठाकरे नेतृत्व करणार
हेही वाचा…एकनाथ शिंदे यांचे निकवर्तीय ‘सचीन जोशी’ला इडीने का उचललं होतं? राऊतांचा सवाल