मुंबई : राज्यसभेतील दोन जागांवर शिवसेनेचेच उमेदवार निवडून येतील, त्यामुळे शिवसेना कोणत्याही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, मग तो कोणीही असो, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा शिवसेेनेची भुमिका स्पष्ट केली. तसेच संभाजी राजे यांनी शिवसेनेची ऑफर धुडकावून ते परत कोल्हापुराच्या दिशेने रवाना झाल्याने आणि शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केल्याने आता राज्यसभेच्या सहाव्या जागेवर पुर्णविराम बसला आहे.
नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात; दाऊदच्या लोकांसोबत व्यवहार केल्याचा न्यायालयाचं निरीक्षण
संजय राऊतांनी समाजमाध्यांमाशी बोलताना संभाजी राजे यांच्याविषयी भाष्य केले. संभाजी राजे यांनी राज्यसभेची निवडणुक अपक्ष म्हणून लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्याअर्थी त्यांना 42 मतांची बेगमी केली असावी, असा माझा समज होता. परंतु संभाजी राजे यांच्याकडे तेवढी मते नव्हती. तेव्हा संभाजीराजे यांनी शिवसेनेकडे मदत मागितली. परंतु आम्हाला 2 उमेदवार निवडून आणायचे आहेत. मग आम्ही त्यांना आमची मतं कशी देणार? राज्यसभेतील संख्याबळ वाढवायचे आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नाहीत, असं राऊतांना म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हांडाचं एक ट्विट; अन् चार जणांवर कारवाईचा बडगा
राज्यसभेची सहावी जागा ही अपक्ष म्हणून लढणार असल्याचे संभाजी राजे यांनी जाहीर केले. तसेच राज्यातील राजकीय पक्षांतील विधानसभा सदस्यांना पाठिंबा देण्यास देखील त्यांनी आव्हान केले. मात्र शिवसेने सहावी जागा लढणार असल्याचा निर्धार केला. तसेच संभाजी राजेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात येईल, असं स्पष्ट केले. मात्र संभाजी राजे यांनी शिवसेनेची ऑफर धुडकावून लावल्याची सध्या चर्चा आहे.
शरद पवारांना औरंगजेब हा सुफी संत वाटतो का? राज ठाकरेंचा तिखट सवाल
दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरूवातीला संभाजी राजे यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र शिवसेनेने मवाळ भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी भूमिकेत बदल केला. शिवसेना जो कोणी उमेदवार उभा करेल, त्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल, असं सांगण्यात आलं. तसेच काल मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची देखील भेट घेऊन संभाजी राजे यांना पाठिंबा देण्याची विनंती केली. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोणाची वर्णी लागते ? त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
Read also:
- “पक्षात १२ वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली? लाथ मारा त्या खासदारकीला”;
- संभाजीनगरचं नामंतर झालं, असं बोलणारा तु कोण? राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
- काॅंग्रेसला गळती, शिवसेनेला चिंता; नाना पटोले म्हणाले, ज्यांना बलिदानाची पार्श्वभूमी नाही त्यांच्याबद्दल..;
- अजून किती काळ नवाब मलिकांची पाठराखण करणार? राजीनामा घ्या; चंद्रकांत पाटील
- “पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊद सोबत संबंध नाही ना?” नवाब मलिक प्रकरणांवरून निलेश राणेंचा तिखट सवाल